उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी भल्या पहाटे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत पोहोचले.
हा दौरा आटोपल्यानंतर अजितदादा इंदापूर आणि सोलापूर या भागांचा दौरा करणार आहेत.
सोलापूरच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी अजित पवार यांनी उजनी धरणाची पाहणी केली.
बारामती आणि उजनी धरणावर अजितदादांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात काय उपाययोजना करायच्या यासंबंधीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अजित पवार हे वेगाने कामे मार्गी लावण्यासाठी आणि धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता त्यांच्या दौऱ्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर भरपाई मिळण्याची आशा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पहाटेच्यावेळीच अनेक भागांना भेटी देताना दिसत आहेत. बारामतीमध्येही अजितदादांनी तोच कित्ता गिरवला.
सोलापूर आणि इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजितदादांच्या दौऱ्यानंतर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूर आणि इंदापूरच्या दौऱ्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवतील, अशी शक्यता आहे.
अजित पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना.
अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना.