कोरोनाचा वाढता धोका पाहता देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मात्र, लॉकडाऊन करुनही अनेकजण विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत.
त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी वरळीच्या रस्त्यांवर पेंटिंग केली जात आहे.
वरळीच्या जी/दक्षिण विभागातील जितके कंटेन्मेंट एरिया आहेत. त्या सर्व 18 झोनच्या रस्त्यांवर कर्मचाऱ्यांनी प्रबोधनपर पेंटिग काढली आहे.
या पेंटिंगच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्याविषयीचे संदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत वरळी हे हायअलर्टवर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण वरळीत आढळले आहेत.
वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, आदर्श नगर, पोलीस वसाहत, जनता कॉलनी, बीडीडी चाळ या भागात कडेकोट संचारबंदी आहे.
पाहा आणखी फोटो