पाणी फाऊंडेशन : एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंय या…
उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे पाण्याचा साठा होऊ लागला आहे. याचा निश्चितच फायदा लोकांना होणार आहे.
Follow us on
उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात पाण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे पाण्याचा साठा होऊ लागला आहे. याचा निश्चितच फायदा लोकांना होणार आहे.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात 108 गावांनी श्रमदान केले. या श्रमदानातून 1 लाख 55 हजार क्यूबिक मीटर तर जेसीबी पोकलेन व इतर यंत्राच्या माध्यमातून 78 लाख क्यूबिक मीटर काम करण्यात आले.
यानुसार आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास 79 लाख 55 हजार क्यूबिक मीटर काम झाले.
पाणी फाऊंडेशनने बांध बंदिस्ती, नाला खोलीकरण, सरळीकरण यासारखी कामे केली आहेत. या कामासाठी एकूण 21 कोटी रुपये खर्च झालेत.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामात 795 कोटी लीटर पाणी साठा अपेक्षित आहे.
पाणी फाऊंडेशनने लोकांच्या मदतीने जिल्ह्यात 21 कोटी रुपयांची कामे केली असून या कामातून 159 कोटी रुपयांच्या पाण्याचा साठा होणार आहे.
मान्सून सुरु झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही.
पण मान्सूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील जागजी गावासह इतर गावातील शेत बांधात पाणी साठले आहे.