देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाण्यातील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता.
अचनाक बत्ती गुल झाल्यामुळे जवळजवळ अख्खी मुंबई ठप्प झाली होती. विजेअभावी हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही जागच्या जागी ठप्प झाली होती.
त्यामुळे कर्जत-कसाऱ्याहून मुंबईकडे येणारे आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारे प्रवासी लोकलमध्येच अडकले होते.
सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना लोकलमधून बाहेर काढण्यासाठी अखेर मुंबई रेल्वे पोलिसांना धाव घ्यावी लागली.
रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांना तात्काळ लोकलमधून खाली उतरवण्यास सुरुवात केली.
एकूण 350 प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी लोकलमधून बाहेर काढलं.