मुंबई : ‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता,’ या शायरीतून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनातून टीकास्त्र सोडलं. अवघ्या सभागृहाचं लक्ष या शायरीनं वेधलं गेलं. हे चित्र अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचं. आज एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारची बहुमत चाचणी झाली. यावेळी बहुमतापेक्षा मोठा आकडा या नव्या सरकारनं गाठला आणि सभागृहातील आपलं वजन यानिमित्तानं दाखववून दिलं. दरम्यान, ‘हर एक का मौका आता है…,’ अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना माफही केलं. तर बहुमत असूनही विरोधी बाकावर बसल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शायरी मात्र चर्चेत राहिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते. ‘
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शायरी म्हटली,
‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता
कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता
मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान
क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता’
….उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेल्या ‘हर एक का मौका आता है…,’ या शायरीतून संसदेत शेरोशायरी करणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांची आठवणी होते.
आपण राज्यासह देशाच्या इतिहासात देखील आतापर्यंत अनेक दिग्गज नेते पाहिले असतील. ज्यांनी आपल्या शेरोशायरीनं सभागृहाचं वातावरण हसत खेळत ठेवलं. तर कुणी त्याच शेरोशायरीच्या माध्यमातून टीकाही केली. इतिहास बघितल्यास माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेत केलेली शेरोशायरी आणि गाजवलेलं सभागृह आजही आठवलं जातं.