मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. अनुदान रखडल्याने केंद्रचालक अडचणीमध्ये सापडले आहेत. अनुदानच मिळत नसल्याने शिवभोज केंद्र यापुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे चालकांनी म्हटले आहे. दरम्यान अनुदानाच्या मुद्द्यावरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आधिच कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता त्यात राज्य सरकारने शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे पैसे थकवल्याने ते अडचणीमध्ये आले आहेत. मात्र शिवसेना आणि राज्य सरकारला त्याच्याशी काहीही देणे -घेणे नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेचा किती जणांना फायदा झाला हा खरा-तर प्रश्नच आहे. मात्र आता गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे अनुदान रखडल्याने केंद्र चालक अडचणीमध्ये आले आहेत. त्यांचा मोठाप्रमाणात तोटा झाला आहे. अनुदानच मिळत नसल्याने ते केंद्र बंद करण्याच्या विचारात आहेत. योजना सुरू केल्यानंतर काही दिवसांमध्येच ही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढावल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपले रोजगार गमावेले होते. या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून शिवभोजन थाळी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गंत अगदी माफक दरात सर्व सामान्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निधी रखडल्याने यातील अनेक केंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक; दरी मिटणार?
राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर
निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला