मुंबई : राज्यात बदलाचे वारे वाहत असून महाराष्ट्राता (Maharashtra) सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करणार असल्याची मोठी माहिती आहे. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे आधीच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यात सरकार बरखास्तीची शिफारस करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतल्याचं दिसतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच (Shivsena) गडाला सुरुंग लावल्यानं राज्यात चर्चेला उधाण आलंय. यामध्ये आता यावर राज्यपाल महोदय काय निर्णय घेणार, हे पहावं लागेल. तर दुसरीकडे भाजपकडून देखील सत्ता स्थापनेची तयारी सुरू अल्याची सुत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळतेय.
महाराष्ट्रात सत्तांतरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने महाराष्ट्रातील प्रभावी नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला गेल्याची माहिती होती. त्यानंतर ते कुठेही दिसून आले नव्हते. त्यामुळे फडणवीस नेमके कुठे आहेत, असा प्रश्न सध्या विचारला जात होता. आता एक बातमी आली आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे भाजपनं सत्तास्थापनेची तयारी केल्याचं दिसतंय.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी येण्याची शक्यता आहे. मी पुन्हा येईल, असं ते यापूर्वी अनेकदा म्हटले होते. यावरुन त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र, आता हेच शब्द खरे ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून कधीही देवेंद्र फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.