भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, आम्ही अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं, रावसाहेब दानवेंचं विधान

| Updated on: Oct 26, 2022 | 3:26 PM

रावसाहेब दानवे यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय...

भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, आम्ही अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं, रावसाहेब दानवेंचं विधान
Follow us on

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी एक विधान केलंय. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होतेय. भाजपमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. गुजरातमध्ये आम्ही सगळं मंत्रिमंडळ (Gujrat Cabinet) बदलून टाकलं, असं दानवे म्हणालेत. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आम्हाला धाक आहे. सरकारी काम दिलं तर तेच आम्हाला करावं लागतं, असंही दानवे (Raosaheb Danave) म्हणालेत.

उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही त्यांना धोका दिला. पण भाजप-सेनेला जनतेने बहुमत दिलं होतं. पण आपल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही हे लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला धोका दिला. काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. हा धोका आम्हाला नव्हता जनतेला होता.पण ही खदखद आमदारांच्या मनात खदखद होती. त्यांनी पुन्हा आपलं सरकार आणलं पण मुख्यमंत्री आपला झाला नाही. राजकारणात बहुमताला घेऊन चालावं लागतं, असं दानवे म्हणाले.

मी लोकसभा निवडणुकीत आजारी पडलो. मला अजिबात चिंता वाटली नाही मी पडेन का? कारण कार्यकर्ते पाठीशी होते. मी आजारी असून लोकांनी मला निवडून दिलं. यावर अर्जुन खोतकर बबनराव लोणीकरांना म्हणाले की, रावसाहेब लई सिरीयस आहे. असं समजून लोकांनी निवडून दिलं पण आपण जर आजारी पडलो तर कशाला मत वाया घालायचं म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलं नसतं, असंही दानवे म्हणालेत.

भाजपचा कार्यकर्ता नरेंद्र मोदींच्या नावानेच निवडणून येतो, असं दानवे म्हणाले. त्याचा पुरावाही त्यांनी दिला. नरेंद्र मोदी बाहेर परदेशी दौऱ्यांवर असतात. अशावेळी निवडूक कसं येणार? असं उत्तर प्रदेशातल्या एका मंत्र्याने विचारलं. त्यावर मोदी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला निवडणून आणतो. मतं थोडीच तुमच्या नावावर पडतात, असा किस्सा दानवेंनी सांगितला. शिवाय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच निवडून येतो, असं आपल्या कार्यकर्त्यांना दानवेंनी सांगितलं.