Zodiac | सावधान ! 17 मे पर्यंत या 5 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडू शकतात अघटित घटना

| Updated on: Apr 12, 2022 | 9:30 AM

मंगळ (Mangal) या अशुभ ग्रहामुळे माणूस अहंकारी, क्रोधी बनू शकतो. तर या उलट ज्या व्यक्तींच्या आयुष्यात मंगळ कमकुवत असतो तो व्यक्ती जबाबदारीपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो.

Zodiac | सावधान ! 17 मे पर्यंत या 5 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडू शकतात अघटित घटना
mangal
Follow us on

मुंबई : मंगळ (Mangal) या अशुभ ग्रहामुळे माणूस अहंकारी, क्रोधी बनू शकतो. तर या उलट ज्या व्यक्तींच्या आयुष्यात मंगळ कमकुवत असतो तो व्यक्ती जबाबदारीपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल (April) महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात सर्व 9 ग्रहांची राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Suryagrahan) देखील होणार आहे. 7 एप्रिल रोजी मंगळाने आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला असून येत्या 17 मे पर्यंत तो या राशीत राहील. 5 राशीच्या लोकांसाठी हा काळ नकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्या या राशींच्या व्यक्तींनी खास काळजी घेण्याची गरज आहे.

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नाही. जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंधही बिघडू शकतात. याशिवाय करिअर-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. न्यायालयीन बाबी तुम्हाला त्रास देतील. कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नका.

कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक अडचणी आणू शकतो. यामुळे तणाव देखील वाढेल आणि कर्ज किंवा कर्ज घेण्याची परिस्थिती देखील उद्भवू शकते. या काळात गुंतवणूक टाळा. विवाहित लोक आपल्या जोडीदाराबद्दल गैरसमजाचे शिकार होऊ शकतात. या काळात मन शांत ठेवा. स्वत:ची काळजी घ्या.

कन्या – कन्या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नगण्य नफा मिळण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक न केल्यास चांगले होईल. उधारीचे व्यवहार टाळा. एकंदरीत हा काळ संयमाने पास करा. चांगली वेळ नंतर नक्कीच येईल.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. घरात वाद होऊ शकतो. काही विवाहित लोकांचे संबंध अडचणीत येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक बाबतीत कठीण असू शकतो. रागामुळे विनाकारण वादात अडकू शकता. अतिरिक्त खर्च येऊ शकतो किंवा आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. यावेळी तुम्हाला शत्रूंपासूनही दूर राहावे लागेल.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

संबंधीत बातम्या :

Zodiac | गुरू देणार आयुष्याला दिशा, 12 वर्षानी गुरू कराणार स्वामी राशीत प्रवेश

Zodiac | महाकंजूस असतात या 4 राशीचे लोक,अफाट संपत्ती मिळवूनही पैसे जपून ठेवतात

Zodiac| 30 वर्षांनंतर 29 एप्रिला शनी करणार स्वराशी कुंभमध्ये प्रवेश, या राशींवर होणार परिणाम