पुजेत का लावला जातो तुपाचा दिवा? जाणून घ्या या संबंधीत महत्त्वाचे नियम

| Updated on: Mar 16, 2023 | 8:10 PM

दिव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिव्या (Diwa Rules) शिवाय कोणतीही पुजा दिव्याशीवाय अपूर्ण मानल्या जाते.

पुजेत का लावला जातो तुपाचा दिवा? जाणून घ्या या संबंधीत महत्त्वाचे नियम
दिवा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात देवी-देवतांची पूजा विधीपूर्वक केली जाते. पुजेच्या विधीमध्ये साहित्यांनादेखील तितकेच महत्त्व आहे. या साहित्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा. दिव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिव्या (Diwa Rules) शिवाय कोणतीही पुजा दिव्याशीवाय अपूर्ण मानल्या जाते. यासोबतच रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये मुख्य दारावरही दररोज दिवा लावला जातो. दिवा लावण्यासाठी तूप किंवा विविध प्रकारचे तेल वापरले जाते. चला जाणून घेऊया तुपाचा दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत आणि त्याच्याशी संबंधित काही विशेष नियम.

दिव्या संबंधी हे नियम अवश्य पाळा

  1.  देवासमोर दिवा लावल्याने अनेक फायदे होतात. यामुळे भगवंतीची आपल्यावर कृपा राहते. त्याचबरोबर वातावरणात सकारात्मकता येते. असे मानले जाते की संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीचा वास घरात नेहमी राहतो. यासोबतच घरातील अनेक वास्तुदोषही दूर होतात.
  2. शास्त्रानुसार तूप आणि तेल या दोन्हींचे दिवे लावल्याने खूप फायदा होतो. दोघांसाठी वेगवेगळे नियम देण्यात आले आहेत. तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा.
  3. हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा आणि शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. याशिवाय बहुतांश देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेषत: तुपाचा दिवा लावावा.
  4. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये दिवा लावताना दिशांचीही काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या ठिकाणी दिवा लावल्याने नुकसान होऊ शकते. दिवा नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

हिंदू धर्मात दिव्याचे महत्त्व

असा विश्वास आहे की भक्त नवरात्रीमध्ये अखंड ज्योतीचा संकल्प करून दिवा प्रज्वलित करतो आणि संपूर्ण आत्म्याने आणि अंतःकरणाने तो प्रज्वलित ठेवला, तर देवी प्रसन्न होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या दिव्यासमोर जप केल्याने हजार पट परिणाम मिळतात. आपण वर्षातून दोनदा देवीची पूजा करतो.

नवरात्री दरम्यान, भक्त माता राणीला प्रसन्न करण्यासाठी कलश, अखंड ज्योती, माता की चौकी इत्यादी विविध प्रकारच्या पूजा करतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवे लावले जातात.

सकाळी आणि संध्याकाळी पूजेमध्ये दिवा लावण्याची परंपरा आहे. वास्तुशास्त्रात प्रकाश आणि दिवा ठेवण्याबाबत अनेक नियम दिले गेले आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)