अमरावती : उद्धव ठाकरेंच्या कालच्या शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana )यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं संतुलन बिघडल्यासारखं वाटत होतं. ठाकरेंच्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात राग दिसत होता. एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. उद्धव ठाकरेंचा शिवाजीपार्कवरील दसरा मेळावा म्हणजे फुसका बार होता. अशी टीका नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर केली आहे.