PM Kisan Yojna : ‘ई-केवायसी’ अनिवार्य मात्र, स्थानिक पातळीवर भलत्याच अडचणी? शेतकऱ्यांकडे पर्याय काय?

| Updated on: Mar 12, 2022 | 5:14 AM

पीएम किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तीन महिन्यानंतर पुन्हा 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. मात्र, ही रक्कम जमा करण्यापूर्वी सरकारने योजनेमध्ये काही बदल करुन काही नियम-अटी लादलेल्या आहेत. एवढेच नाही त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर 31 मार्चपर्यंत 'ई-केवायसी' करुन घ्यावे लागणार आहे.

PM Kisan Yojna : ई-केवायसी अनिवार्य मात्र, स्थानिक पातळीवर भलत्याच अडचणी? शेतकऱ्यांकडे पर्याय काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

उस्मानाबाद : (PM Kisan Sanman Yojna) पीएम किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तीन महिन्यानंतर पुन्हा 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. मात्र, ही रक्कम जमा करण्यापूर्वी सरकारने योजनेमध्ये काही बदल करुन काही नियम-अटी लादलेल्या आहेत. एवढेच नाही त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर 31 मार्चपर्यंत (e-KYC)’ई-केवायसी’ करुन घ्यावे लागणार आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सीएससी केंद्रावर अडचणी निर्माण होत आहेत. ‘ई-केवायसी’ करण्यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेट्रिकही बंद आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आता 25 मार्च रोजी राबविण्यात येणाऱ्या शिबिरात यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. जर ई-केवायसी केले नाही तर 11 वा हप्ता जमा होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांकडे केवळ 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.

‘ई-केवायसी’ नेमक्या अडचणी काय?

‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. अधिकतर शेतकरी हे सीएससी केंद्रावरच ही प्रक्रियाम करीत आहेत. मात्र, या सेंटरवर शेतकऱ्यांना तासंतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक साईट बंद होते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने केवासीला मुकावे लागत आहे. शिवाय गरजेचे असलेले बायोमेट्रिक हे दोन ते तीन दिवसच सुरळीत सुरु झाले पण आता समस्या निर्माण होत आहेत.

31 मार्च अखेरची मुदत

मार्चनंतर केव्हाही 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच अनुशंगानेच यंत्रणा कामाला लागलेली आहे. आता महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे गावस्तरावर येऊन सर्वे करणार आहे. याच बरोबर केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आगामी 20 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतोय यावर तोडगा काढणीची मागणी केली जात आहे.

*अशी आहे eKYC करण्याची सोपी पध्दत

eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

*आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget 2022 : पंचसूत्री कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी झुकतं माप, काय आहेत तरतूदी?

शेवटी नुकसानच : धावपळ करुन बाजारपेठ गाठली जे वावरात झालं नाही ते बाजार समितीमध्ये घडलं

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा