Mango: आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत ‘अशी’ घ्या काळजी, तरच उत्पादनात होईल वाढ

आंबा फळबागांची लागवड करताना महत्वाचे असते ते क्षेत्र. आंब्याच्या एकदा लागवड झाली की, ते अनेक वर्ष उत्पादन देणारे फळपिक आहे. ज्या शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून तयारी करणे गरजेचे आहे. आंबा हे असे फळपिक आहे जे कोणत्याही मातीच्या प्रकरात घेता येते. मात्र, वाढीसाठी खडकाळ, मुरमाड आणि क्षारयुक्त मातीचे क्षेत्र अधिक उपयोगी मानले जाते.

Mango: आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत अशी घ्या काळजी, तरच उत्पादनात होईल वाढ
खरेदी केंद्राच्या माध्यमातून आता हापूस आंब्याची विक्री होणार असल्याचे कृषी पणन मंडळाने सांगितले आहे.
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 1:13 PM

मुंबई : (Mango orchard) फळबाग असो की कोणत्याही हंगामातील पिके, त्याची लागवडीपासूनच योग्य काळजी घेतली तर वनस्पतीची वाढ आणि त्याच बरोबर उत्पादनात देखील वाढ होणार आहे. विशेष: (Mango) आंबा फळबागांची लागवड करताना महत्वाचे असते ते क्षेत्र. आंब्याच्या एकदा लागवड झाली की, ते अनेक वर्ष उत्पादन देणारे फळपिक आहे. ज्या (Farmer) शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून तयारी करणे गरजेचे आहे. आंबा हे असे फळपिक आहे जे कोणत्याही मातीच्या प्रकरात घेता येते. मात्र, वाढीसाठी खडकाळ, मुरमाड आणि क्षारयुक्त मातीचे क्षेत्र अधिक उपयोगी मानले जाते. काळाच्या ओघात आता उत्पादनाकरिता अधिकचा काळ वाट पाहण्याची गरज नाही. याकरिता गरजेचे आहे ते सुधारित वाण. या वाणानुसार आंब्याचे तीन प्रकार पडतात. यामध्ये झटपट फळधारणा करणारे यामध्ये वृंजळफाली, तोतपरी, गुलाबखास, लंग्रा, बॉम्बे ग्रीन आणि दशाहरी यांचा समावेश होतो. दुसरी प्रकार फळलागवडीसाठी मध्यम काळ लागतो. यामध्ये मल्लिका, हिमसागर, आम्रपाली, केसर, सुंदरजा आणि अल्फोन्जो यांचा समावेश आहे. तिथेच तिसर् या वाणाचे फळ उशिरा मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी चौन्सा आणि फालजी ची निवड करू शकतात.

आंब्याचे रोप विकसीत करण्याची पध्दत

आंब्याच्या चांगल्या रोपासाठी त्याच्या दाण्यांची पेरणी ही जून-जुलैमध्येच केलेली फायदेशीर ठरणार आहे. मे महिन्यामध्ये 50 सेमी व्यास असलेला खड्डा खोदून त्यामध्ये 30 ते 40 किलो कुजलेले शेणखत आणि 100 ग्रॅम क्लोरोपायरिफस पावडर टाकावी लागणार आहे. ऐन पावसाच्या तोंडावर म्हणजेच जुलै-ऑगस्ट महिन्यात रोपाची लागवड ही करावी लागणार आहे. जर शेतकऱ्यांकडे पाण्याचे योग्य नियोजन असेल तर फेब्रुवारी महिन्यातही लागवड करता येते. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. लागवडीनंतर शेतकऱ्यांना दोन-तीन वर्ष योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यानंतर मात्र, केवळ उत्पादनच घ्यावयाचे आहे.

काय आहे रोग प्रतिबंधक उपाय?

कधीकधी फळं झाडावरून अकाली पडू लागतात. हे टाळण्यासाठी युरियाचा 2 टक्के द्रावण करून झाडांवर फवारणी करता येते. याकरिता नॅफिलीनदेखील वापरू शकता. प्रथम फळधारणा झाल्यावर जी फवारणी केली जाते त्याच औषधांचा हा फळांवर आणि आंब्याच्या झाडावरही होणार आहे. हे टाळण्यासाठी 700 मिली मिथाइल पॅराथिऑन 70 ईसी 700 लिटर पाण्यात मिसळलेले फवारावे. आंब्याची काढणी करताना विशेष काळजी घेणे गरजेचेन आहे. आंब्याची पिकलेली फळे 8 ते 10 मीटर लांब देठांनी काढणी करावीत. यामुळे फळांवर स्टेम रॉड आजाराचा धोका नाही. आंब्याची काढणी ही हातानेच करणे फायदेशीर राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea: ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर

पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर