AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर

पीकविमा योजनेत सहभागी होऊन देखील राज्यातील तब्बल 84 हजार शेतकऱ्यांना खरीप विमा हा मिळालेला नव्हता. त्यामुळे तक्रारी आणि शेतकऱ्यांचे दावे ही प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. असे असताना दुसरीकडे रब्बी पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jan 17, 2022 | 11:49 AM
Share

पुणे : खरीप हंगामात (Crop Insurance) पीकविमा कंपन्यांचा मनमानी कारभार झाला असला तरी (Rabi Season) रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग हा वाढलेलाच आहे. पीकविमा योजनेत सहभागी होऊन देखील राज्यातील तब्बल 84 हजार शेतकऱ्यांना खरीपचा विमा हा मिळालेला नव्हता. त्यामुळे तक्रारी आणि (Farmer) शेतकऱ्यांचे दावे ही प्रक्रिया अद्यापही सुरुच आहे. असे असताना दुसरीकडे रब्बी पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी कंपन्यांकडे तब्बल 677 कोटी रुपये हे अदा केले आहेत. रब्बीचा पेरा होताच वातावरणातील बदल आणि राज्य सरकारने ‘विकेल तेच पिकेल’ या संकल्पनेवर भर दिल्यामुळेच हा बदल झाला असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

गतवर्षीपेक्षा 44 हजारांनी वाढली शेतकरी संख्या

पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहवयास मिळत आहे. पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या हीताची असल्याचा विसरच या कंपन्यांना पडतो की काय अशी स्थिती खरीप हंगामाच्या दरम्यान, झाली होती. असे असताना यंदा वातावरणातील बदलामुळे संभाव्य धोका लक्षात घेत 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 44 हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिक विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळावी या उद्देशाने योजनेत सहभाग हा नोंदवलेलाच आहे.

बाजारात दर तेच पीक वावरात

यंदा रब्बी हंगामातील समीकरणे ही पूर्णत: बदललेली आहेत. एकतर रब्बी हंगातील पिकांचा पेरा महिन्याभराने लांबणीवर पडलेला होता. शिवाय सुरवातीच्या काळात पोषक वातावरण होते म्हणून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून पारंपारिक पिकांपेक्षा बाजारभावात ज्या पिकांचे मुल्य आहे अशाच पिकांचा पेरा केला होता. यामध्ये कडधान्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. संभाव्य धोका लक्षात घेताच शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलेला आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

असे आहे रब्बी विमा योजनेचे स्वरुप

निसर्गाचा लहरीपणा असो उत्पादनात सरासरीपेक्षा अधिकची घट असो अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना कायम उपयोग झाला आहे. रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात जोखीम अधिक असते. यंदा मात्र, तसा काहीसा फरकच राहिलेला नाही. वातावरणातील बदल सध्याही सुरुच आहे. त्यामुळे 1 लाख 7 हजार 545 कर्जदार शेतकऱ्यांनी तर 11 लाख 37 हजार 22 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर या सहभागी शेतकऱ्यांचे 8 लाख 46 हजार 182 हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षणात आले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

पारंपरिक पिकांवर कृषी विभागानेच शोधला पर्याय अन् नगर जिल्ह्यात झाला हा बदल, वाचा सविस्तर

Rabi Season: अवकाळी, गारपिटीनंतर आता धुक्याचे सावट, खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात

Organic Farming: सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला टोमॅटो 400 रुपये किलो अन् वर्षभर उत्पादन

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?