वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी: आता वाहनांची कागदपत्रे फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत वैध, जाणून घ्या…

| Updated on: Oct 02, 2021 | 7:54 AM

कोरोना महामारीमुळे केजरीवाल सरकारने राज्यातील वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. तर संपूर्ण देशात MORTH वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे. केजरीवाल सरकारने हा निर्णय दिल्लीतील लोकांची सोय लक्षात घेऊन घेतला.

वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी: आता वाहनांची कागदपत्रे फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत वैध, जाणून घ्या...
Driving Licence
Follow us on

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि परमिट म्हणजेच वाहन परवाना यांसारख्या वाहनांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची वैधता कोरोना महामारीमुळे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध केलीय. MORTH नुसार, ही वैधता फक्त त्या वाहनांवर लागू होईल, ज्यांच्या कागदपत्रांची मुदत 21 फेब्रुवारी 2020 नंतर संपली आहे. त्याच वेळी, MORTH ने सर्व राज्य सरकार आणि RTO कार्यालयांना यासंदर्भात सूचित केलेय. मोर्थच्या या निर्णयाचा तुमच्यावर किती परिणाम होईल हेसुद्धा जाणून घ्या.

दिल्लीत 30 नोव्हेंबरपर्यंत दिलासा मिळेल

कोरोना महामारीमुळे केजरीवाल सरकारने राज्यातील वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. तर संपूर्ण देशात MORTH वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे. केजरीवाल सरकारने हा निर्णय दिल्लीतील लोकांची सोय लक्षात घेऊन घेतला.

मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली

मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली. यापूर्वी वैधता 30 मार्च 2020 रोजी वाढवण्यात आली होती. त्यानंतर जून 2020 मध्ये पुन्हा मुदत वाढवण्यात आली. त्यानंतर मुदत 24 ऑगस्टला वाढवण्यात आली आणि तीच मुदत डिसेंबर 2020 आणि मार्च 2021, जून 2021 आणि आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून नवीन तारीख जाहीर करण्यात आली. जिथे केंद्र सरकारने वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. त्याचबरोबर दिल्ली सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली. अशा परिस्थितीत आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र आणि परमिटचे नूतनीकरण करण्यासाठी बराच वेळ आहे.

आता पेट्रोल पंपावरही ई-वाहन चार्ज करता येणार

देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे. लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. अनेक ऑटो कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे काम करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे. आता देशात EV चार्जिंग स्टेशनची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. पेट्रोलियम कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) पाच हजार पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार आहे.

संबंधित बातम्या

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?

Important news for motorists: now vehicle documents are only valid till 31st October, find out