Diabetes: ही लक्षणे जाणवत असतील तर तुमचा मधुमेह आहे धोकादायक पातळीवर, अनेक जण करतात दुर्लक्ष

| Updated on: Jan 18, 2023 | 6:49 PM

रक्तातील साखर वाढते तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला अनेक सिग्नल देते.

Diabetes:  ही लक्षणे जाणवत असतील तर तुमचा मधुमेह आहे धोकादायक पातळीवर, अनेक जण करतात दुर्लक्ष
मधुमेह
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे, त्यावर मात करण्यासाठी रुग्णाने आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर आणि आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या आजारात रुग्णाने खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेची अत्याधिक वाढ रुग्णासाठी घातक ठरू शकते. रक्तातील साखर वाढते तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला अनेक सिग्नल देते. जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, कमकुवत दृष्टी आणि वजन कमी होणे ही देखील रक्तातील  उच्च साखरेची लक्षणे आहेत.

याशिवाय अनियंत्रित रक्तातील साखरेमुळे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांनाही हानी पोहोचते, ज्यामुळे अवयवांना रक्तपुरवठा होण्यास त्रास होतो. या आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास मानवासाठी प्राणघातक ठरू शकतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी विशेषतः शरीराच्या या भागांमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे.

साधारणपणे, 140 mg/dL (7.8 mmol/L) पेक्षा कमी रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य मानली जाते. जर ते 200 mg/dL च्या वर असेल तर याचा अर्थ तुमची साखर जास्त आहे. परंतु जर ते 300 mg/dL च्या वर गेले तर ते खूप धोकादायक असू शकते. या प्रकरणात, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे सुद्धा वाचा

डोळ्यातील हे बदल मधुमेहाचे लक्षण आहेत

 

रक्तातील साखरेची वाढलेली पातळी म्हणजेच रक्तातील साखर डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकते, ज्यामुळे अंधुक दृष्टी, मोतीबिंदू, काचबिंदू आणि बहुधा डायबेटिक रेटिनोपॅथी यासारख्या डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. रेटिनोपॅथी म्हणजे डोळयातील पडद्याचा आजार जो डोळ्याच्या मागील बाजूस असतो. उपचाराविना असेच राहिल्यास मधुमेही रुग्णांची दृष्टी कमी होऊन ते अंधही होऊ शकतात.

पायांमध्ये या लक्षणांकडे लक्ष द्या

मधुमेहाचा तुमच्या पायावर दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये पहिला मज्जातंतूचे नुकसान (नर्व्ह डॅमेज) आणि दुसरा रक्ताभिसरण (रक्त परिसंचरण) यांचा समावेश आहे. जेव्हा मज्जातंतूचे नुकसान होते तेव्हा तुमच्या पायाला कोणत्याही प्रकारची संवेदना जाणवू शकत नाही. दुसऱ्या स्थितीत, तुमच्या पायापर्यंत रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे कोणताही संसर्ग बरा करणे कठीण होते. कालांतराने, त्या जखमा किंवा संक्रमणांवर उपचार न केल्यास, तुम्ही ते अवयव गमावू शकता.

मधुमेहाचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो

मूत्रपिंड हा शरीराचा अविभाज्य भाग आहे जो शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यास मदत करतो. त्यामध्ये लहान रक्तवाहिन्या असतात ज्या अवयव कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत करतात. परंतु उच्च रक्तातील साखरेमुळे या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे दीर्घकाळात मधुमेही मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो. त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असेही म्हणतात. यामध्ये व्यक्तीला वारंवार लघवी होणे, रक्तदाबात अडथळे येणे, पाय, घोटे, हात व डोळे सुजणे, मळमळ, उलट्या, थकवा अशा अनेक समस्या असू शकतात.

हा मधुमेहाचा मज्जातंतूंवर होणारा परिणाम आहे

डायबेटिक रेटिनोपॅथी आणि नेफ्रोपॅथी प्रमाणे, उच्च रक्तातील साखरेमुळे देखील मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. या स्थितीत, पीडित व्यक्तीच्या शरीरात सुन्नपणा येतो आणि वेदना, तापमान, जळजळ, उबळ आणि स्पर्श जाणवण्याची क्षमता कमी होते. याशिवाय व्यक्तीच्या पायात अल्सर आणि इन्फेक्शन सारखी लक्षणेही दिसतात.

हृदय व रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो

 

मधुमेह हा रक्तातील साखर वाढवणारा आजार असल्याने त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णाला पक्षाघात, हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका नेहमीच असतो. याव्यतिरिक्त, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांना उच्च रक्तदाबासह हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या अनेक आजारांचा धोका असतो.