Hot Water Bath: तुम्ही देखील करत असाल कडक गरम पाण्यानी आंघोळ, तर जाणून घ्या त्याचे परिणाम

| Updated on: Jan 08, 2023 | 11:51 AM

हिवाळ्यात आपण सर्वच आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करतो, पण अंघोळीनंतर अंगावर...

Hot Water Bath: तुम्ही देखील करत असाल कडक गरम पाण्यानी आंघोळ, तर जाणून घ्या त्याचे परिणाम
गरम पाण्याने आंघोळ करता?
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, सध्या सगळीकडे कड्याक्याची थंडी पडत आहे, या ऋतूत अंथरुणावर बसून चहा, कॉफी पिण्यासोबत गरम पाण्याचा शॉवर (Hot water Bath) घेण्याचा आनंद वेगळाच असतो. हिवाळ्यात आपण सर्वच आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करतो, पण अंघोळीनंतर अंगावर खाज येणे,  जळजळ होणे, पिंपल्स आणि केस गळणे या समस्यांना समोर जावे लागते वास्तविक, सामान्यपेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे हानिकारक ठरू शकते तसेच, त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या हिवाळ्यात तुम्हीही गरम पाण्याच्या आंघोळीचा आनंद घेत असाल तर त्याचे काही दुष्परिणाम देखील जाणून घ्या.

काय परिणाम होतो?

डोळ्यांच्या आर्द्रतेवर परिणाम होऊ शकतो-  गरम पाण्याने अंघोळ केल्याने डोळ्यातील आर्द्रतेवर परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांना खाज येणे, कोरडेपणा, लालसरपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कोरड्या डोळ्यांची समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ अजिबात करू नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे खूप फायदेशीर ठरते.

प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम- हे थोडे विचित्र वाटेल, परंतु वारंवार गरम पाण्याचा शॉवर घेतल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर आंघोळ करताना गरम पाणी टाळावे. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची संख्या प्रभावित होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

केस आणि त्वचेसाठी हानिकारक- गरम पाणी केसांसाठी खूप धोकादायक ठरू शकते, कारण गरम पाण्यामुळे केसांमधील केराटिन पेशी कमकुवत होतात आणि त्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे केस पातळ होतात, कमकुवत होतात आणि गळू लागतात. केसांसाठी कोमट पाणी कोणते आहे. गरम पाण्याने चेहरा धुणे देखील योग्य नाही, कारण यामुळे त्वचेच्या संरक्षणात्मक थरावर परिणाम होतो, त्वचा कोरडी होते आणि मुरुम येऊ शकतात.

त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात- गरम पाण्याचा आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल की गरम पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा, कोरडेपणा आणि चिडचिड जाणवू लागते. खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. थंडीत आंघोळीसाठी कोमट पाणी वापरू शकता.