Amravati : अमरावतीत कॉलराने 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एकुलत्या एक वेदश्रीच्या मृत्यूने आईवडिलांवर मोठा आघात

| Updated on: Jul 28, 2022 | 11:17 AM

बुधवारी सकाळी तिचा मृतदेह गावात आणल्यानंतर एकच आक्रोश पाहायला मिळाला होता.

Amravati : अमरावतीत कॉलराने 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एकुलत्या एक वेदश्रीच्या मृत्यूने आईवडिलांवर मोठा आघात
अमरावतीत चिमुकलीचा मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती : अमरावतीत कॉलराचा (Amravati News) धोका वाढलाय. दोन वर्षीय चिमुकलीला कॉलराची (Cholera in Amravati) लागण झाली होती. तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्यामुळे अमरावतीत हळहळ व्यक्त केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे हा अमरावती जिल्ह्यातील कॉलराचा सहावा बळी आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur News) तालुक्यातील शिंदी बुर्दूक गावातील वेदश्री निलेश मेहरे वय 2 वर्ष या चिमुकलीला कॉलराची लागण झाली होती. तिच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान, तिने अखेरचा श्वास घेतला. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे वेदश्रीच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावात शोककळा पसरली. कॉलरा मुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एकुलची एक मुलगी गमावली..

मेहेरे दाम्पत्याला वेदेश्री एक एकुलती एक मुलगी होती. पण तिचा मृत्यू झाल्यानं वेदेश्रीच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह गावात आणल्यानंतर एकच आक्रोश पाहायला मिळाला होता. तिच्या आईवडिलांसह नातलगांनी एकच हंबरडा फोडला.

स्वच्छतेचा प्रश्न

शिंदी गावातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकसहभागातून बोरवेल करून घेतल्या होत्या. या बोअरवेलमधून गावकऱ्यांनी टाकलेल्या पाइपलाइन चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामधून गेल्या आहेत. त्यामुळे हेच दूषित पाणी गावकरी पितात. हे पाणी प्यायलामुळे वेदेश्रीला त्रास असून तिला पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आता गावातील पाण्याच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तर डायरीयाची लक्षणं असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

डीएचओ डॉ. दिली रणमले यांनी दिलेल्या माहितीनुसार वेदश्रीला कॉलरा संशयित रुग्ण म्हणता येऊ शकतं. पण तिचे काही अहवाल अजूनही बाकी आहेत. पण कॉलराची साथ अजूनही गावात नाही. तसंच कॉलराची लक्षणं असलेला इतर कोणत्याही रुग्णाचं निदान झालेलं नाही. पण अशाही स्थितीत गावातील लोकांनी स्वच्छता राखणं आणि स्वच्छ पाणी पिण्याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जातेय.