मोठी बातमी! फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

| Updated on: Dec 01, 2022 | 1:09 PM

शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मोठी बातमी! फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत खैरे हे मीडियाशी संवाद साधत होते. या सरकारला शिवाजी महाराजांविषयी काही आस्था नाही. शेतकऱ्यांबद्दल कनवाळा नाही. केवळ आमदार पकडून ठेवायचे. त्यांना खोके द्यायचे एवढंच सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही खोके दिले काही लोकांना. पाच पाच खोके दिले असं म्हणतात. अशा पद्धतीने तिकडे लक्ष आहे. याबाबाचं काही इकडे लक्ष नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. वीज बिल थकल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून आवाहन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. शेतकरी राजा जगला तर प्रजा जगेल आणि प्रजा जगली तरच राजा जगेल, असं शिवाजी महाराज सांगायचे. प्रजा जगली तरच राजा जगेल असं ते म्हणायचे. इतकं मोठं मन राज्याचं होतं. एवढा मोठा विचार होता. असं असतानाही राज्यपाल महाराजांचा अवमान करतात. ही काळी टोपी महाराष्ट्राचं काळं करायला आली की काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

लोढा आणि भाजपचे त्रिवेदी महाराजांबद्दल बोलत असेल तर आम्हाला राग आला आहे. शिवसेना हळूहळू आक्रमकता दाखवेल आणि या सरकारला खाली खेचेल. हे खोके सरकार आहे. ते काहीही बरळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.