आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या देशात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात देखील लम्पी या आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. लम्पी प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लम्पी आजाराबाबत सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. राजू शेट्टी यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या वतीने देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. प्राण्यांच्याबाबतीत आणीबाणीची स्थिती असताना सरकारचं धोरण स्पष्ट नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.