मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक भाग आणि सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही. यामुळे महावितरणाने मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आता SMS द्वारेही मीटर रिडींग ग्राहकांना मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे. (MSEDCL Electricity consumers will now send the meter readings themselves)
कोरोना प्रादुर्भावामुळे महावितरणाला मीटर रिडींग घेणे शक्य होत नाही. यामुळे महावितरणाने मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे मीटर रिडींग पाठवण्याची सोय करुन दिली होती. त्यापाठोपाठ आता मोबाईल एसएमएसद्वारे ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्यात येणार आहे. यामुळे ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही, अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मीटर रिडींग कसे पाठवाल?
SMS द्वारे मीटर रिडींग कसे पाठवाल?
स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचे फायदे काय?
वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे आणि रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. यांसह इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
(MSEDCL Electricity consumers will now send the meter readings themselves)
संबंधित बातम्या :
Mohammad Shahabuddin | तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू
International Labor Day 2021 : जाणून घ्या 1 मे रोजी ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?