AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षित वेळेपेक्षा आधी शिगेला पोहोचल्याचे आता स्पष्ट होत आहे. | Coronavirus peak in India

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज
प्रातिनिधिक छायाचित्र
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 01, 2021 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली: येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचेल, असे भाकीत केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाने वर्तविले आहे. देशात करोनाचा संसर्ग 3 ते 5 मेदरम्यान टिपेला  पोहोचू शकतो. कोरोना (Coronavirus) शिगेला पोहोचण्याची वेळ आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर आली. कारण, कोरोनाचा संसर्ग अपेक्षेपेक्षा वेगाने फैलावला, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. (India Covid Cases May Peak Next Week Says Government Advisor)

शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख एम. विद्यासगार यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी यासंदर्भात संवाद साधला. आमच्या अंदाजानुसार, आगामी आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचेल. यापूर्वीच्या अंदाजानुसार 5 मे ते 10 मे या काळात कोरोना शिगेला पोहोचेल, असा अहवाल शास्त्रज्ञांनी केंद्राकडे सादर केला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षित वेळेपेक्षा आधी शिगेला पोहोचल्याचे आता स्पष्ट होत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर शुक्रवारी हा आकडा 3.86 लाख या उच्चांकी पातळीला जाऊन पोहोचला होता. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशात आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. परिणामी अनेकांना बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांसाठी झगडावे लागत आहे.

जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?

देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

या’ लोकांना कोरोना लसीच्या दोन डोसची गरज पडणार नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या (Covid vaccine) दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने ( Penn institute of immunology)यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: ‘या’ लोकांना दोन डोसची गरज पडणार नाही; भारत कोरोना लसीकरणाची रणनीती बदलणार?

संपूर्ण महाराष्ट्राला सुरक्षित करायचं तर काय करावं? इंग्लंड, जर्मनी, कॅनडाचा फॉर्म्युला, वाचा सविस्तर

(India Covid Cases May Peak Next Week Says Government Advisor)

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला