ENG vs IND : अभिषेकचा तडाखा, श्रेयस- शिवमची फायर खेळी, इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
England vs India 1st T20I 1st Innings Highlights : टीम इंडियाने 3 फलंदाजांनी केलेल्या फायर खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या.

Shreyas Iyer and Abhishek Sharma Team IndiaImage Credit source: Bcci x Account
टीम इंडियाने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर पहिल्या टी 20i सामन्यात 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे भारताला 189 धावांपर्यंत पोहचता आलं. फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडलीय. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडला 189 धावांआधी रोखण्यात यशस्वी ठरणार का? यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Follow Us
