AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा

England vs India 1st T20I Match Result : टीम इंडियाने 3 फलंदाजांनी केलेल्या फायर खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र पावसामुळे इंग्लंडला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

ENG vs IND : पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
England vs India 1st T20i RainImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 02, 2026 | 1:41 AM
Share

क्रिकेट चाहत्यांना ज्याची भीती होती अखेर तेच झालं आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा अखेर पावसामुळे नाईलाजाने रद्द करण्यात आला आहे. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेस्टर ली स्ट्रीटमधील रिव्हरसाईड ग्राउंड स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पहिला डाव आटोपल्यानंतर जोरदार पाऊस आला. काही मिनिटं पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस थांबायचा नावच घेत नव्हता. पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच होती. त्यामुळे नाईलाजाने उभयसंघातील सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी लागली. बीसीसीआयने उभयसंघातील पहिला सामना रद्द करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. टीम इंडियाचा या मैदानातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध टॉस जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. भारताने इंग्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे भारताला 189 धावांपर्यंत पोहचता आलं.

संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांनी निराशा केली. संजूने 1 धाव केली. तर इशानला भोपळाही फोडता आला नाही. हर्षित राणाही झिरोवर आऊट झाला. अक्षर पटेल चोरटी धाव घेताना रनआऊट झाला. उपकर्णधार तिलक वर्मा याने 13 रन्स केल्या. मात्र अभिषेक, श्रेयस आणि शिवम या त्रिकुाटाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठता आली. भारतासाठी श्रेयसने 47 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. अभिषेकने 24 चेंडूत 59 धावा केल्या. शिवमने 21 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. इंग्लंडसाठी साकीब महमूद याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

चाहत्यांना टीम इंडियाच्या बॅटिंगनंतर बॉलिंगची प्रतिक्षा होती. मात्र पावसाचा वेग आणखी वाढला. पाऊस थांबेल किंवा जोर कमी होईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे अखेर काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 4 जुलैला होणार आहे.

Follow Us
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर