मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडखोरी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा राजीनामा यादरम्यान राज्याच्या राजकारणाला प्रचंड वेग आला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resigned) दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपा सत्तास्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले. यामुळे राज्यात परत एकदा भाजपाचे (BJP) सरकार येणार असल्याचे संकेत आहेत.
यह तो झांकी है….
हे सुद्धा वाचामुंबई महापालिका अभी बाकी है…!@Dev_Fadnavis @Devendra_Office @OfficeofUT pic.twitter.com/8BsMSBqR2W
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) June 29, 2022
याचदरम्यान मुंबई भाजपाचे एक ट्विट व्हायरल होताना दिसते आहे, या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि फडणवीस यांच्या हातामध्ये बॅट आहे. हे ट्विट शेअर करताना लिहिले आहे की, यह तो झांकी है….मुंबई महापालिका अभी बाकी है…! विशेष म्हणजे हे ट्विट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना टॅन करण्यात आलयं. आताच राज्यातील सत्तासंघर्ष कमी झालेल्या असताना मुंबई भाजपाकडून अशाप्रकारचे ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिकांवर शिवसेनेची सत्ता धोक्यात आलीयं. तसेच 16 महापालिकांच्या निवडणूका देखील तोंडावर असल्याने शिवसेनेला हा मोठा धक्काच समजला जातो. मुंबई महापालिकेमध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीमध्ये आमचीच सत्ता मुंबई महापालिकेवर येणार असल्याचा दावा यापूर्वी अनेकदा भाजपाकडून करण्यात आलायं. आता तर राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हटल्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप अजून जास्त ताकदीने लढणार हे नक्की आहे.