SAAMANA : माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये, सामनातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सडकून टीका

| Updated on: Apr 11, 2022 | 7:18 AM

"विरोधी पक्षाने महाविकास आघाडीशी (MVA) राजकीय विचाराने संघर्ष करायला हरकत नाही. तो विरोधकांचा हक्क आहेच. पण माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे (Maharashtra) व मराठी (Marathi) परंपरेचे नुकसान करीत आहोत. महाराष्ट्र तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते.

SAAMANA : माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये, सामनातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सडकून टीका
सामनातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सडकून टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – अण्णा हजारे वगळता सगळ्या महाराष्ट्राने तेव्हा हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याचे समर्थन करणारे अण्णा हजारे आज विस्मृतीत गेले. भाजपच्या गुणरत्नांचे समर्थन करणाऱ्यांनी हे विसरू नये. माकडांची माणसं झाली यास उत्क्रांती म्हणतात, पण काही माकडं ही माकडेच राहिली. त्या माकडांच्या हाता”विरोधी पक्षाने महाविकास आघाडीशी (MVA) राजकीय विचाराने संघर्ष करायला हरकत नाही. तो विरोधकांचा हक्क आहेच. पण माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे (Maharashtra) व मराठी (Marathi) परंपरेचे नुकसान करीत आहोत. महाराष्ट्र तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही” अशी टीका सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती करण्यात आली आहे.

भाजपची नवरत्ने व आजचे गुणरत्ने !

देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला हे अत्यंत धक्कादायक आहे. स्वत:ला एसटी चालक समजणारा एक गट शरद पवारांच्या घराकडे पोहोचला. हिंसक लोकांनी शरद पवारांच्या घरावरती हल्ला केला. तसेच ती मद्यधुंद झुंड होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय सलोख्यास काळीमा फासला आहे. मुंबईतील कामगार चळवळीस एक परंपरा आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबईतील कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. कामगार चळवळ सुध्दा यामुळे बदनाम झाली आहे. एसटी कामगारांचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही मागणी सोडली तर बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी चितावणीखोर भाषणे केली

गुणरत्न सदावर्ते यांनी आतापर्यंत अनेकदा एसटी कामगारांच्या समोर चितावणीखोर भाषणे केली आहेत. तसेच शरद पवाराच्या घरात जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे असं देखील म्हटलं आहे. कामगारांचे प्रश्न सरकारला सुटावे असे वाटतं होते. परंतु सदावर्तेला तसे वाटत नसावे. प्रकऱण अधिक चिघळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एसटी कामगारांना राज्य शासनात का विलीनीकरून घेता आले नाही. तसेच हा प्रश्न हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही अशी देखील टीका सामनातून करण्यात आली आहे.

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?

सोमय्यांसोबत खडसेंचं ये दोस्ती नहीं तोडेंगे, तर फडणवीसांना दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे…

Special Report | Raosaheb Danve यांच्याकडे भाजप-मनसेच्या ‘रेल्वे’जोडणीचं काम?-tv9