AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?

आज शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावतीतून विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे. राज्य आपल्या हातात आलंय, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे(BJP). देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?
शरद पवारांची विरोधकांवर सडकून टीकाImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 10, 2022 | 10:39 PM
Share

अमरावती : दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर झालेल्या आंदोलनाने (St Woker Protest) राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाचा पूर आलाय. आज शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावतीतून विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे. राज्य आपल्या हातात आलंय, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे(BJP). देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. सतत काही ना काहीही करुन तीन्ही पक्षाला त्रास दिला जातोय. मात्र शेवटी आपली सामुहिक शक्ती तयार केली तर हे प्रयत्न हानून पाडू, असे म्हणत पवारांनी भाजपवर पुन्हा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवरूनही पवार भाजपवर सतत आरोप करत आहेत.

संकटांना घाबरून जायचं नसतं

गेले 40 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केल. कालच्या घरावरच्या हल्ल्यात कामगारांना दोष नाही, नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात. सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकवलं, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसेच नरसिंहराव यांच्या काळात दंगली झाल्या. दंगली नंतर मी महाराष्ट्रात आलो तेव्हा दंगली झालेल्या भागात मी जायचो. तेव्हा हिंदू- मुस्लीम दंगल घडवण्याचा डाव होता. तेव्हा शुक्रवारी बॅाम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर सुरळीत सुरु केलं होतं. अशी संकट येतात त्यातून सावरावं लागतंय, असेही पवार म्हणाले. तसेच खिलारीला भुकंप झाला तेव्हा 800 लोक मृत्यूमुखी पडले होते, मोठं संकट आलं होतं. त्या संकटाच्या काळातंही सावरलं. एका महिन्यात प्रत्येकाची घरं बांधून दिली. संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं त्याला तोंड द्यायचं असतं, कालचं संकट काही संकट नाही. त्याला महत्त्व द्यायचं नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे.

देशात फूट पाडण्याचं काम सुरू

तसेच काश्मीरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. आता एका चित्रपटात हिंदूंवर अत्याचार कसा होतो हे दाखवले. काश्मीर फाईल चित्रपट बघीतला पाहिजे असं आवाहन केंद्र सरकरने केलं. तेव्हा देशात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होतं त्याला भाजपचा पांठिबा होता. याला भाजप जबाबदार आहे. हे देशाच्या एकतेला सुरुंग लावण्याचं काम आहे. याविरोधात लोकांनी एकत्र यायला हवं. जातीयवाद, धर्मांच्या नावावर राजकारण करतात अशांच्या विरोधात उभं राहयचंय, असेही पवार म्हणाले. तसेच महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वत्र महागाई वाढते. देशात बेरोजगारी आहे. सरकार देशाच्या समोरच्या प्रश्नाला सहकार्य करत नाही. तसेच कुणी राज्या-राज्यात संघर्ष निर्माण करत असेल तर एकत्र यायला हवं, असे आवाहन यावेळी पवारांनी केलं.

Mumbai Police : गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पवारांच्या घराबाहेरील राड्यानंतर मोठी कारवाई

पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत