AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी सणसणीत उत्तर दिलंय. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे.

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा
रिकामा सिलेंडर वाजवायचा का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवालImage Credit source: tv9
| Updated on: Apr 10, 2022 | 6:45 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा (Kolhapur North By Election) प्रचार आता शेवटच्या टप्प्याला आला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा शिगेला पोहचल्या आहेत. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांनी सणसणीत उत्तर दिलंय. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे. तसेच वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलचं धारेवर धरलं आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना रेशन दिलं मात्र ते शिजवायचं कसं? सिलेंडरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोकांना सिलेंडर घेणंचं परवडेना झालंय. त्यामुळे आधी कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा का? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी महागाईवरून केंद्र सरकारला केला आहे.

महागाईवरूव केंद्रावर हल्लाबोल

तसेच केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाहीत म्हणतही त्यांनी हल्लाबोल चढला आहे. एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता? त्यावेळी काही वाटतं नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. खोट नाट सांगून कदाचित इतर राज्यात तुमचं राजकारण चालत असेल पण महाराष्ट्त्रात त्याला फळं लागणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. कोल्हापुरातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारानिमीत्त ते बोलत होते.

भगवा पुसू देणार नाही

कोल्हापूर हा भगव्याची बालेकिल्ला आहे. नानांच्या प्रचाराला फडणवीस आले यावरून समजून जा. बोलायला काही मुद्दे नसले की भ्रम निर्माण करायचा ही त्यांची सवय आहे, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. रामाचा जन्म झाला नसता तर यांच राजकारण कस चाललं असतं? ते रेटून खोट बोलत आहेत ते सत्य आहे असं वाटत आहे. आपण कशातच कमी पडत नाही आम्ही खोट बोलण्यात कमी पडतो पण कमी पडलो तरी चालेल खोट बोलणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. कोल्हापुरात सरकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यापुढे ही यशस्वी करायचा आहे. निवडणून आल्यावर गुण्या गोविंदाने कामं करा. रात्र वैऱ्याची आहे पण काळजी करू नका. कोल्हापूर मधून भगवा पुसेल असं कोणीही कितीही म्हणालं तरी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मी हे होऊ देणार नाही, असे विरोधकांना थेट आव्हानही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

CM Uddhav Thackeray : ‘जाऊ दे! जीभ अडकायची माझी’ चंद्रकांत पाटलांवर टीका करताना असं का म्हणाले ठाकरे?

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

Kolhapur | भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख राज ठाकरेंकडे?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.