AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताला बसला सर्वात मोठा धक्का, टॅरिफबाबत मोठी बातमी, आता नवीन संकट

मोठी बातमी समोर येत आहे, भारताला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टॅरिफबाबत मोठी बातमी समोर आली असून, याचा मोठा परिणाम हा निर्यातीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताला बसला सर्वात मोठा धक्का, टॅरिफबाबत मोठी बातमी, आता नवीन संकट
Tariff
| Updated on: Jan 01, 2026 | 12:33 AM
Share

अमेरिका भारतावर सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत रशियाकडून तेल खेरदी करतो म्हणून गेल्या ऑगस्ट महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली होती. त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. हा अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात जास्त टॅरिफ आहे. दरम्यान या टॅरिफचा मोठा परिणाम हा निर्यातीवर झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेला भारताकडून ज्या वस्तू निर्यात होत होत्या, त्याचं प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. याचा काही प्रमाणात फटका हा निर्यातदारांना बसला आहे. मात्र हा फटका जसा भारताला बसला आहे, तसाच तो अमेरिकेला देखील बसला आहे. भारताकडून होणाऱ्या वस्तूंची निर्यात कमी झाल्यानं अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, अमेरिकेत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, अमेरिकेतूनच आता भारताविरोधातील टॅरिफ मागे घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनमध्ये होणारी निर्यात वाढली आहे.

एकीकडे अमेरिकेचा टॅरिफ दबाव असतानाच आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतावर आणखी एका देशाचा टॅरिफ लागू झाला आहे. ज्या देशांसोबत मुक्त करार (FTA) नाही अशा देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच मॅक्सिकोने केली होती. त्यानुसार आता एक जानेवारी 2026 पासून मॅक्सिकोचा टॅरिफ लागू झाला आहे, आशिया खंडातील अनेक प्रमुख देशांवर मॅक्सिकोने टॅरिफ लावला आहे, यामध्ये भारत, चीनसह अनेक देशांचा समावेश आहे. दरम्यान या टॅरिफचा मोठा फटका आता भारताच्या निर्यातीला बसण्याची शक्यता आहे. मॅक्सिकोकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.

निर्यातदारांमध्ये चिंता

दरम्यान मॅक्सिकोने भारतावर टॅरिफ लावल्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, एकीकडे अमेरिकेचा टॅरिफ कायम असताना आता मॅक्सिकोने देखील टॅरिफ लावल्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र याचा भारतावर नेमका किती परिणाम होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.तर दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता भारताला दोन मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यानंतर भारताची चीन आणि रशियात होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून, भारताची रशिया आणि चीनसोबत वाढलेली जवळीकता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत