AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे दिल्लीत असताना काँग्रेस नेते राहुल गांधींशी फोनवरून चर्चा केली. जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन, राहुल गांधींना झालेल्या अटकेसह नीट परीक्षा पेपरफुटीवर या दोघांमध्ये चर्चा झाली. केजरीवाल यांच्याशी भेटीनंतर, ठाकरे-गांधी यांच्यात नीट घोटाळ्यावर संसदेत एकजुटीने आवाज उठवण्यावर रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2026 | 2:13 PM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. काल त्यांनी अभिजीत दीपके आणि आंदोलकांशी चर्चा करून त्यांना संबोधित केलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. उद्धव ठाकरे आज दुपारीच मुंबईकडे यायला निघणार आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या कालच्या आंदोलनावरही त्यांच्याशी चर्चा केली.

उद्धव ठाकरे कालपासून दिल्लीत आहेत. दिल्लीतून मुंबईकडे निघण्यापूर्वी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांना पोलिसांनी अक्षरश: उचलून घेत पोलीस ठाण्यात नेलं होतं. रात्री उशिरा सोनिया गांधी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या या आंदोलनावर आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नीट परीक्षा फुटीबाबत संसदेत एकत्रितपणे आवाज उठवण्याबाबातही यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच विरोधक म्हणून मुलांच्या मागे ताकदीने उभ राहील पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोनवरून सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

केजरीवाल- ठाकरे भेट

दरम्यान, आज आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जंतरमंतरवरील आंदोलन आणि देशातील इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली. 2024 मध्ये नीटची परीक्षा झाली होती. त्यावेळी पेपर लिक झाला होता. त्या प्रकरणातील मास्टर माइंडची वेळेवर चार्जशीट दाखल केली नाही. जे चोर आहेत. त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली जात नाही. त्यांना ऑटोमॅटिक बेल मिळेल अशा पद्धतीने वागत आहेत आणि म्हणता आम्ही परीक्षा पद्धतीवर काम करत आहोत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकांचं ऐका…

मी उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो होतो. देशात जे आंदोलन सुरु आहे, यावर सविस्तर चर्चा झाली. सध्याची परिस्थिती भयानक आहे. हे विद्यार्थी आहेत. देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यावर अमानुष लाठीमार करू नका. त्यांच्याशी असं वागू नका, असं मी सरकारला सांगितलं. आम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले. भोपाळचा एक विद्यार्थी बघितला. तो स्वतः डबा घेऊन इकडे आला आहे. पूर्ण जनपथ भरलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यातुन विद्यार्थी येत आहेत. शिक्षण व्यवस्थेत खूप गोंधळ आहे. लोकांना समाधान मिळालं नाही, त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांना रोखण्याचं काम करू नका. लोकांचं म्हणणं ऐका. फायद्याचं राहील, असा सल्लाही केजरीवाल यांनी दिला.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..