AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर (Bjp) घणाघात केला आहे. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे आम्ही हिंदुत्त्वाला सोडले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2022 | 5:01 PM
Share

आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर (Bjp) घणाघात केला आहे. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे आम्ही हिंदुत्त्वाला सोडले असे होत नाही. रामाचा जन्म झाला नसता तर यांचं राजकारण कस चाललं असत.? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही खोटं बोलण्यात कमी पडलो, खोटं बोल पण रेटून बोल ही शिवसेनेची संस्कृती नाही, अनेक जण खोट आणि रेटून बोलतात यावरच तर त्यांचे राजकारण सुरू आहे. असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजप म्हणते आम्हाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल आदर आहे, मग माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत आम्हाला दिलेला शद्ब का मोडला, आम्ही बाळासाहेबांच्या खोलीला मंदिर मानतो, मात्र त्या मंदिरता भाजपाने दिलेला शद्ब पाळला नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला, खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपाची संस्कृती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही खोट बोलण्यात कमी पडलो, मात्र खोट बोलणं शिवसेनेच्या रक्तात नाही. आम्ही जे करतो ते लपून छपून नाही तर समोरासमोर करतो. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही. काहींनी जाणून बूजून खोटा प्रचार करून समाजात दरी निर्माण करण्याची सवय असते. राम जन्मला नसता तर भाजपाचे राजकारण झाले नसते अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

…तर अमित शहांनी शद्ब का मोडला?

एकीकडे भाजप म्हणते आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो, मग माझा त्यांना सवाल आहे की? तुम्ही बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शद्ब का मोडला. आम्ही बाळासाहेबांच्या खोलीला मंदिर मानतो, याच मंदिरात युती संदर्भात बोलणे झाले होते, मग तुम्ही तुमचा शद्ब का मोडला. तुम्हाला जर बाळासाहेबांबद्दल आदर आहे, तर समृद्धी महामार्गाला त्यांचे नाव देण्यास भाजप का विरोध करत आहे. शिवसेना काँग्रेसला मतदान करणार का तर नक्की करणार काँग्रेसला मतदान करण पाप असेल तर मेहबुबा मुफ्ती वेळी काय झालं होतं असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

Sharad Pawar : आंदोलकांचा घरात घुसून पवारांना इजा करण्याचा डाव होता, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?

MNS BJP: रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार?

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत