मनोज जरांगे पाटील दिवसे न् दिवस ओबीसी नेत्यांवर खालची भाषा वापरत आहेत. राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची भाषा करत आहे. तुमची तेवढी उंची आहे का? आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असेल तर कोण कुणाला पाडणार हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा देतानाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळेच राज्यातील ओबीसी एकवटला आहे, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.