Aaditya Thackeray : कसाबच्यावेळीही एवढी सुरक्षा नव्हती, एवढा बंदोबस्त कशाला?; आदित्य ठाकरेंचे टोले आणि सवाल

| Updated on: Jul 03, 2022 | 11:05 AM

Aaditya Thackeray : बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. आता तुमच्यात आणि आमच्यातही दोरी लावली आहे. कधी आमदार आणि मीडियात दोरी लावलेली नव्हती. आता तुम्ही त्यांना गुवाहाटीला पळून नेणार आहात की आणखी काय करणार आहात? त्याला आम्ही काय करणार?

Aaditya Thackeray : कसाबच्यावेळीही एवढी सुरक्षा नव्हती, एवढा बंदोबस्त कशाला?; आदित्य ठाकरेंचे टोले आणि सवाल
कसाबच्यावेळीही एवढी सुरक्षा नव्हती, एवढा बंदोबस्त कशाला?; आदित्य ठाकरेंचे टोले आणि सवाल
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: विधानभवन परिसरातील सुरक्षेवरून शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजप (bjp) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. सरकार तुमचं आहे. पोलीस तुमच्या हातात आहे. तरीही तुम्हाला भीती एवढी कशाची आहे? कसाबला पकडलं तेव्हा त्यालाही एढी सुरक्षा दिलेली नव्हती. एवढी सुरक्षा बंडखोरांना द्यायला भीती कशाची आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच आरेमध्ये कारशेड करू नका. मुंबईची वाट लावू नका. मुंबईतील आरेच्या जंगलातील जैवविविधता टिकली पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालय आम्हीच सील केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. आता तुमच्यात आणि आमच्यातही दोरी लावली आहे. कधी आमदार आणि मीडियात दोरी लावलेली नव्हती. आता तुम्ही त्यांना गुवाहाटीला पळून नेणार आहात की आणखी काय करणार आहात? त्याला आम्ही काय करणार? कोण तेच पळून जाणार? एवढी भीती कशाला. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना आणि विधानभवनाच्या परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना एवढा बंदोबस्त का? कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कशासाठी एवढा बंदोबस्त?

मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल. कसाबलाही आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्हीच कार्यालय सील केलं

विधीमंडळ कार्यलय आम्हीच सील केलं. पुन्हा हाऊसमध्येच मोठ्या ताकदीने यायचं आहे. चावी आमच्याकडे आहे. काही लोकांना दुसरीकडे सील केलं होतं. आमच्या कार्यालयाचं काय? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनाच व्हीपच अधिकृत आहे. तोच मानावा लागेल. ही नैतिकतेची टेस्ट आहे. हा विश्वासघात आहे की आणखी काय? असा सवाल त्यांनी केला.

भाजपला काय मिळालं?

आमचे सर्व आमदार मित्र पक्ष आहे. त्यांच्यासोबतच बसायचं आहे. आम्ही एक कुटुंब आहोत, असंही त्यांनी सांगितलं. स्पीकर इलेक्शनमध्ये एक शिवसैनिक आणि दुसरा माजी शिवसैनिक आहे. त्यात भाजपला काय मिळालं?, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईला धोका देऊ नका

आम्ही आरेच्या आंदोलनाला मी गेलो नाही. अधिवेशन असल्यामुळे जाता आलं नाही. आरेचं जंगल आहे. ते राहू द्या. पहाडी गोरेगाव, बीकेसी आणि कांजूर मार्ग आहे हे दोन पर्याय आहेत. तिथे कारशेड करा. मुंबईला धोका देऊ नका. मुंबईचा विचार करणे गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.