ब्रिस्बेन : नवख्या टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला. भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. रिषभ पंत यानं 89 धावांची ऐतिहासिक खेळी केली. रिषभ पंतनं विजयी चौकार खेचत बॉर्डर गावस्कर मालिकेत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत केले. तुमच्याबद्दल अभिमान वाटतो, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.( Ind Vs Aus 4th Test victory moment of team India in fourth test match against Australia)
Young India’s spirit truly resonates. A young, inexperienced team of promising cricketers beat the mighty Australia in their own backyard. A massive test win. Proud of you team India! Take a bow! What a nail-biting and thrilling match. Test cricket at its very best!!#INDvsAUS pic.twitter.com/j16NFed3dy
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 19, 2021
आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दुसऱ्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह 89 धावांची विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेटकिपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे. भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.
A moment to savour for India! #AUSvIND pic.twitter.com/vSogSJdqIw
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2021
कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदांजांना 20 विकेट घ्याव्या लागतात, असं म्हटलं जातं. टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 369 धावांवर रोखल. पहिल्या डावात शार्दूल ठाकूर, टी,नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांनी 3 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं 1 एक विकेट घेतली. पहिल्या डावात केवळ एक विकेट घेतलेल्या मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 5 विकेटस घेतल्या. मराठमोळ्या शार्दूल ठाकूरनं देखील ऑस्ट्रेलिाच्या 4 विकेट घेतल्या तर वॉशिग्टन सुंदरनं एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 294 धावांवर रोखण्यात गोलंदाजांची देखील महत्वाची भूमिका होती.
संबंधित बातम्या:
Aus vs Ind 4th Test | संयमी गिलने पाया रचला, धडाकेबाज रिषभ पंतने कळस चढवला
Ind Vs Aus | BCCI ने पेटारा उघडला, टीम इंडियाला बोनस जाहीर, जय शहांची मोठी घोषणा
रितेश देशमुख म्हणाला, टीम इंडिया ‘लय भारी’, संभाजीराजे म्हणतात ‘अमेझिंग’
( Ind Vs Aus 4th Test victory moment of team India in fourth test match against Australia)