Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?

| Updated on: May 04, 2022 | 9:37 AM

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत.

Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?
Follow us on

सोलापूर : उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकरीच प्रयत्नशील आहेत असे नाही तर (Government) शासकिय स्तरावरही वेगवेगळे उपक्रम राबवून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर (Solapur Zilha Parshad) जिल्हा परिषद व पंचायत समितीला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्वजनिक जागांवर फळबाग लागवड करण्याची मोहिमच जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्न तर वाढणार आहे पण (Orchard) फळरोपांच्या लागवडीने परिसर हा वृक्षाच्छादित होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग महत्वाचा आहे. फळबागामुळे उत्पादनात तर वाढ होणार आहेच शिवाय वृक्षलागवडीचे उद्दीष्टही साध्य होणार आहे. 1 मे पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे.

या भागात होणार फळबाग लागवड

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत. एवढेच नाही तर वैयक्तिक पातळीवर आणि शेती बांधावरही फळबाग लागवडीच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

स्थानिक प्रजातींना प्राधान्य

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माथा ते पायथा या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर ज्या फळांसाठी पोषक वातावरण आहे त्याच फळांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये चिंच, आवळा, बोर, डाळिंब याची लागवड केली जाणार आहे. संवर्धनाच्या अनुशंगाने तालुका निहाय अंमलबजावणीचा अहवाल हा सादर करावा लागणार आहे. यामध्ये हलगर्जीपणा चालणार नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

ग्रामपंचायती बनवणार अंदाजपत्रक

शिवारात गायरान कीती ? किती क्षेत्रावर फळबागेची लागवड होऊ शकते या अनुशंगाने अंजाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थळ निश्चिती करुन त्या क्षेत्रावर कोणते फळरोपाची लागवड करायची यासंदर्भातील अहवाल हा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण वृक्ष वाढणार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.