Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत.

Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 4:19 PM

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना (Soybean Rate) सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण आता ती आशा धुसर होताना दिसत आहे. एवढेच नाही (Soybean Stock) साठवणूक केल्याचा पश्चाताप होईल असेच सध्या सोयबीनचे दर आहेत. 5 महिन्यात प्रथमच सोयाबीन हे 7 हजाराच्या खाली आले आहे. नोव्हेंबरपासून 7 हजार रुपये क्विंटल असेच दर राहिले आहेत. पण गेल्या 8 दिवसांपासून चित्र बदलले आहे. (Central Government) केंद्र सरकारने सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीनची मागणी घटली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी सुरु होतानाच झालेली दरातील घट शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय राहणार आहे. त्यामुळे दरात लागलीच सुधारणा झाली नाही तर मात्र, नुकसान अटळ आहे.

केंद्र सराकारकडून सोयापेंडची आयात

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत. त्यामुळे एवढ्या दिवस साठवणूक करुन उपयोग काय अशी स्थिती झाली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजकांनी लागेल त्यानुसारच सोयाबीनची खरेदी करुन सोयापेंडचे उत्पादन घेतले होते. पण आता दर घसरल्याने प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन खरेदीलाच ब्रेक लावले आहे.

उन्हाळी सोयाबीनची धास्ती

शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनवर भर दिला होता. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीनमध्ये वाढ होणार आहे. उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यास दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यंतरी 7 हजार 600 दर असताना ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे चांगले साधले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतीमालाच्या दरातच घसरण

सोयाबीनच्या दरातच घसरण झाली असे नाही तर तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले आहेत. त्यामुळे विक्री की साठवणूक हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तुरीचे दर 6 हजार तर खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 असा दर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे मका आणि तुरीची खरेदी केंद्रावर विक्री हाच पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....