AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत.

Latur Market : सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्र बदलले
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 02, 2022 | 4:19 PM
Share

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना (Soybean Rate) सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण आता ती आशा धुसर होताना दिसत आहे. एवढेच नाही (Soybean Stock) साठवणूक केल्याचा पश्चाताप होईल असेच सध्या सोयबीनचे दर आहेत. 5 महिन्यात प्रथमच सोयाबीन हे 7 हजाराच्या खाली आले आहे. नोव्हेंबरपासून 7 हजार रुपये क्विंटल असेच दर राहिले आहेत. पण गेल्या 8 दिवसांपासून चित्र बदलले आहे. (Central Government) केंद्र सरकारने सोयापेंडची आयात केल्याने सोयाबीनची मागणी घटली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी सुरु होतानाच झालेली दरातील घट शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय राहणार आहे. त्यामुळे दरात लागलीच सुधारणा झाली नाही तर मात्र, नुकसान अटळ आहे.

केंद्र सराकारकडून सोयापेंडची आयात

केंद्र सरकारच्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वीही तुर आयातीची मुदत वाढविल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरातही झपाट्याने घसरण सुरु आहे. गत आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत. त्यामुळे एवढ्या दिवस साठवणूक करुन उपयोग काय अशी स्थिती झाली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजकांनी लागेल त्यानुसारच सोयाबीनची खरेदी करुन सोयापेंडचे उत्पादन घेतले होते. पण आता दर घसरल्याने प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन खरेदीलाच ब्रेक लावले आहे.

उन्हाळी सोयाबीनची धास्ती

शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनवर भर दिला होता. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी सोयाबीनमध्ये वाढ होणार आहे. उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यास दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यंतरी 7 हजार 600 दर असताना ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे चांगले साधले आहे.

शेतीमालाच्या दरातच घसरण

सोयाबीनच्या दरातच घसरण झाली असे नाही तर तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले आहेत. त्यामुळे विक्री की साठवणूक हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तुरीचे दर 6 हजार तर खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 असा दर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे मका आणि तुरीची खरेदी केंद्रावर विक्री हाच पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

Follow Us
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....