Amitabh Bachchan यांच्या आयुष्यातील ‘ते’ 41 दिवस, कुटुंबापासून दूर बिग बीचां संन्यासाची कहाणी काय होती?

| Updated on: Mar 30, 2024 | 2:16 PM

Amitabh Bachchan | फार कमी लोकांना माहिती आहे, अमिताभ बच्चन यांच्या संन्यासाची कहाणी, बिग बी 41 दिवस कुटुंबापासून होते दूर... बिग बी यांच्या आयुष्यातील फार मोठं सत्य... अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम असतात उत्सुक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा...

Amitabh Bachchan यांच्या आयुष्यातील ते 41 दिवस, कुटुंबापासून दूर बिग बीचां संन्यासाची कहाणी काय होती?
Follow us on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बिग बी यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रा पार देखील आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सिनेमांच्या कथेला अमिताभ बच्चन यांनी वेगळं वळण दिलं. अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांप्रमाणेच त्यांचं खासगी आयुष्य देखील एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. अमिताभ बच्चन यांच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. बिग बी यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी माहिती झाल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल..

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक टप्पा असा होता, जेव्हा त्यांनी कुटुंब आणि रॉयल लाईफस्टाईलचा त्याग करत संन्यास घेतला होता. 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘शराबी’ सिनेमाच्या दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर मौन सोडलं. मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्रिदंडी संन्यास घेतला होता का? असा प्रश्न विचारला होता.

संन्यास घेतल्याच्या प्रश्नावर होकार देत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मी त्रिदंडी संन्यास घेतला होता. यामध्ये 41 दिवस उपवास ठेवला जातो. कुटुंबापासून देखील दूर राहावं लागतं. एवढंच नाहीतर, दारू आणि मांसाहार सोडावा लागतो, अनवाणी राहाव लागतं आणि भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात. जमीनीवर झोपावं लागतं… याला एक प्रकारे संन्यासच म्हणतात…’ याच एका गोष्टीमुळे बिग बी तेव्हा तुफान चर्चेत आले होते.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांनी घेतला होता त्रिदंडी संन्यास ?

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘माझा कोणता नवस नव्हता… माझे काही मित्र असं करत होते. त्यामुळे त्यांना पाहून मी देखील त्रिदंडी संन्यास घेण्याचा विचार केला… त्यानंतर मला प्रचंड आनंद झाला होता…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते. सागंयचं झालं तर, अमिताभ बच्चन कायम मुलाखती, ब्लॉग आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रोफेशनल, खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बी ‘गणपत’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात बिग बींसोबत टायगर श्रॉफ आणि कृती सनॉन यांनी देखील मुख्य भूमिका साकराली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेट ठरला.. आता बिग बी The Umesh Chronicles, कल्कि 2898 AD, बटरफ्लाय आणि Vettaiyan सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.