AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes : साखर खाल्ल्याने नाही होत डायबेटीस, मग कसा होता जाणून घ्या

भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह ही आता सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. जे धोकादायक असू शकते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह नक्की कशामुळे होते जाणून घ्या.

Diabetes : साखर खाल्ल्याने नाही होत डायबेटीस, मग कसा होता जाणून घ्या
| Updated on: Feb 21, 2024 | 7:19 PM
Share

Diabetes reasons : जेव्हा मधुमेहाबाबत बोलले जाते साखरेची चर्चा होतेच.  सामान्य लोकांना असे वाटते की, मधुमेह हा जास्त साखकर खाल्ल्याने होते. पण हा प्रत्यक्षात एक भ्रम आहे. मधुमेह होण्यामागचे मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. मधुमेह कसा होतो आणि त्याचे कारण काय हे जाणून घेऊयात. मधुमेह हा उच्च रक्तातील साखरेमुळे होणारा आजार असला तरी तो साखर खाल्ल्याने होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होऊ शकत नाही, परंतु त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो.

मधुमेह कसा होतो?

जेव्हा शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देणे थांबवते तेव्हा त्याचे पचण थांबते. त्यामुळे साखर ही थेट रक्तामध्ये जाते. त्यामुळे मधुमेह होतो. म्हणूनच WHO सांगते की, लोकांनी आपल्या दैनंदिन कॅलरीजपैकी 10% पेक्षा जास्त साखरेचा वापर करु नये.

– BMI > 30 सह लठ्ठपणा – बैठी जीवनशैली – अनुवांशिकता

या तीन कारणांमुळे मधुमेह होतो. डॉक्टर सांगतात की, जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करणे थांबवते किंवा जेव्हा पेशी तयार होणाऱ्या इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात तेव्हा मधुमेह होतो. जर एखाद्याला मधुमेह झाला असेल तर त्याला साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखरेचे चयापचय करण्यासाठी इंसुलिनला कार्यक्षमतेने कार्य करावे लागते. त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये साखरेचे सेवन केल्यास ग्लुकोजची पातळी वाढते आणि त्यामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे केवळ साखरच नाही तर सर्व पदार्थ ज्यामध्ये ग्लुकोज असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियंत्रित पद्धतीने याचे सेवन करावे.

खाल्ल्यानंतर साखरेची पातळी का वाढते?

खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखरेची पातळी वाढते. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर हे सर्वच लोकांमध्ये होते. पण जेव्हा हे घडते, तेव्हा स्वादुपिंडात दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया घडतात. इन्सुलिनचे उत्सर्जन आणि अमायलिन नावाचे संप्रेरक सोडणे.

Amylin अन्नाला लहान आतड्यात जेथे बहुतेक पोषक द्रव्ये शोषली जातात तेथे खूप लवकर पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करते. बहुतेक वेळा, खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेमध्ये तात्पुरती वाढ होऊ शकते. ते लक्षातही येत नाहीत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.