VIDEO : पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला आहे. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले […]

VIDEO : पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला आहे. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता.

बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार अशी धमकीच दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘शिवद्रोही ब.मो. पुरंदरेंना पद्मविभूषण जाहिर, छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट, महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय’. पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा, शिवसन्मान परिषदा घेणार. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांच्या नावे हॅशटॅग केला आहे.

अशा दोन पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यानही जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरंदरेंना विरोध केला होता. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि जीवनावर वादग्रस्त लिखान केलं आहे. तसेच त्यांच्यावर हा पण आरोप आहे की, त्यांनी शिवाजींचे गुरु समजले जाणारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे.

कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.