कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनी बिल्डरच्या घशात? 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण, न्यायासाठी राज्यपालांकडे धाव

| Updated on: Feb 24, 2021 | 12:56 AM

एमआयडीसीने प्रकल्प उभारणीसाठी घेतलेली जमीन बिल्डरच्या घशात घातल्याचा खळबळजनक आरोप कुकशेत ग्रामस्थांनी केला आहे.

कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनी बिल्डरच्या घशात? 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण, न्यायासाठी राज्यपालांकडे धाव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

नवी मुंबई : एमआयडीसीने प्रकल्प उभारणीसाठी घेतलेली जमीन बिल्डरच्या घशात घातल्याचा खळबळजनक आरोप कुकशेत ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे विकासासाठी शेतजमिनी, राहती घरे कवडीमोल भावाने अधिग्रहण करायची आणि नंतर बिल्डरला विकून मोकळे व्हायचे असा प्रकार ठाणे-बेलापूर एमआयडीसीत होत असल्याचा आरोप होतोय. शिवाय त्याबदल्यात जमिनी आणि घरे गेलेल्या गावाला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे (Kukshet villagers fast for land approach Governor Bhagat Singh Koshyari).

शिरवणे एमआयडीसीमध्ये कुकशेत गावाच्या जागेवर हायड्रिलिया कंपनी उभारण्यात आली. त्यामुळे गावाचे पुनर्वसन नेरुळ सेक्टर चौदा येथे करण्यात आले. शेतजमीन आणि वडिलोपार्जित घरांच्या बदल्यात नोकरीचे आश्वासन एमआयडीसी आणि हार्डेलिया कंपनीच्या व्यवस्थापकाने पाळले नाही. कुकशेत ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि युवकांच्या नोकरीचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्र आणि भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी केला. याविरोधात गेल्या 4 दिवसांपासून हार्डलिया कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे .

1995 मध्ये हायकोर्टाने कंपनी उभारणीसाठी शेतजमिनी देणाऱ्या कुकशेत गावचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत. शेत जमिनीच्या मोबदल्यात तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले. मात्र. 50 वर्ष होऊन देखील अनेक ग्रामस्थांना पूर्णतः नोकरीत समाविष्ट करुन घेतले नाही. नोकरीत समाविष्ट करुन घेतलेले ग्रामस्थ सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दुसरीकडे कंपनी प्रशासनाने कंपनीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं म्हटलंय. तसेच भविष्यात नोकर भरती झाल्यास स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

Western Maharashtra Rain Updates : आधी कोरोनाचं संकट, आता अवकाळ पाऊस, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

व्हिडीओ पाहा :

Kukshet villagers fast for land approach Governor Bhagat Singh Koshyari