AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याचे पिक धोक्यात आलंय. Alphonso Mango producer Farmer

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात
कोकणातील आंबा उत्पादक आणि मच्छीमार संकटात सापडलेत
| Updated on: Feb 20, 2021 | 4:16 PM
Share

रत्नागिरी: कोकणावरील संकटाची मालिका काही थांबत नसल्याचं चित्र आहे. सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातील नागरिकांना बसला. आता अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याचे पिक धोक्यात आलंय. सध्या ढगाळ हवामानामुळे आलेल्या मोहोर टिकवायचा कसा हे मोठं आव्हान आंबा बागायतदारांसमोर असणार आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, मिरकरवाडा, नाट्ये अशा बंदरात सध्या नौका उभ्या आहेत. (Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change)

फवारणीचा खर्च वाढणार

वातावरणातील बदल आणि पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे फवराणीचा खर्चाची भर पडणार आहे. सध्या हवामानातील बदलामुळे पालवीला मोहोर आलेला नाही. तर १५ मे नंतरच्या आंब्यावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलाय.

आंबा धोक्यात का आलंय त्याची कारणे

आंबा बागायतदार तुकाराम घवाळी हापूस आंब्याला थंडी गायब झाल्यानं अपेक्षित मोहोर आलेला नाही. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीसह ढगाळ वातावरणामुळे मोहोरातून तयार झालेली कणी गळून जाणार आहे. पाऊस आणि उन्हाळा आंब्याच्या मोहोराला धोकादायक वातावरण समजले जाते. त्यामुळे पालवीला मोहर फुटण्याची शक्यता कमी असल्याचे तुकाराम घवाळी यांनी सांगितले.

मासेमारीवर संकट

समुद्रातील वादळ सदृष्य परिस्थितीचा परिणाम कोकणातल्या मासेमारीवर झाल्याचे पाहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, मिरकरवाडा, नाट्ये अशा बंदरात सध्या नौका उभ्या आहेत. समुद्रातील वादळ सदृष्य परिस्थितीमुळे मच्छीमारांचे 6 कोटींचे नुकसान झालंय. पंधरवड्यापासून समुद्रातील पाण्याला करंट त्यामुळे मासेमारीची जाळी रिकामी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमार हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

कोरोना ते अवकाळी संकटांची मालिका सुरुच

कोकणातील मच्छीमारांसमोरील संकटांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जवळपास चार ते पाच महिने मच्छीमारीचा व्यवसाय बंद राहिला होता. कोरोना संकटामध्येच निसर्ग चक्रीवादळानं कोकणाला झोडपले. आता वादळ सदृष्य परिस्थिती असल्यानं रत्नागिरीतील मच्छीमारांचं 6 कोटींचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या:

Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change

(Alphonso Mango producer Farmer facing problems due to climate change)

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.