Cheetahs in India : 70 वर्षानंतर देशात पुन्हा दिसणार चित्ते, अफ्रिकेतील चित्त्यांना आणण्यासाठी कोट्यवधींचा खर्च
दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना कुनो येथे कसे आणले जाईल हे अद्याप ठरलेले नसले तरी त्यांना दिल्ली ते ग्वाल्हेर आणि तेथून मालवाहू वाहनातून रस्त्याने कुनो येथे नेण्यात येणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत.
भोपाळ : 70 वर्षांनंतर मध्य प्रदेशात पुन्हा चित्ता (Cheetahs) दिसणार आहे. श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) 8 चित्ते आणण्याची तयारी सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत चित्ते कुनोला पोहोचणार असल्याची चर्चा असून, त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली आहे. तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी. पहिल्या टप्प्यात 4 नर आणि 4 मादी चिते इथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. कतार एअरवेजने या चित्त्यांना भारतात आणण्याचे स्वीकारले आहे. आहे. दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना कुनो येथे कसे आणले जाईल हे अद्याप ठरलेले नसले तरी त्यांना दिल्ली ते ग्वाल्हेर आणि तेथून मालवाहू वाहनातून रस्त्याने कुनो येथे नेण्यात येणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे लवकरच आता मध्य प्रदेशात चिते पाहयाला मिळणार आहेत.
पुढील काळात संख्या वाढणार
पुढील 6 वर्षांत येथे 50 ते 60 चित्ता धावताना दिसतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर दुसऱ्याच दिवशी ते चित्तांसह भारतात येणार आहेत. सध्या केंद्र सरकारचे दोन अधिकारी दक्षिण आफ्रिकेत या कामासाठीच मुक्कामी आहेत.
चित्त्यांची खास देखरेख
दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया विद्यापीठाचे एड्रियन ट्रॉडिफ यांच्या देखरेखीखाली चित्त्यांना भारतात आणले जाईल. ट्रॉडिफ हे जवळपास दोन दशकांपासून दक्षिण आफ्रिकेत चित्त्यांचा अभ्यास करत आहेत. तेथून भारतात आणले जाणाऱ्या 8 चित्त्यांवरही त्यांनी बारकाईने काम केले आहे.
आणखी एक करार बाकी
नामिबिया आणि भारत सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत सामंजस्य करार करणे बाकी आहे. त्याची फाइल सध्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याकडे आहे. मात्र राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच चित्त्यांची पहिली खेप भारताकडे रवाना होणार आहे. अशी माहितीही त्यांच्याकडून देण्यात आलीय.
सरकारी सुत्रांचा अंदाज
12 ऑगस्टला नामिबियाहून जोहान्सबर्गला विमानाने चित्त्यांना आणण्याची तयारी सुरू आहे. यास सुमारे 2 तास 10 मिनिटे लागतील. त्याच दिवशी जोहान्सबर्गहून दिल्लीला आणता येईल, यासाठी सुमारे 14 तास लागतील. दिल्ली ते ग्वाल्हेर त्यांना चार्टर विमानाने आणेल. येथून कुनोला रस्त्याने नेले जाईल. म्हणजेच 13-14 ऑगस्टपर्यंत चित्ते कुनो पार्कमध्ये पोहोचणे अपेक्षित आहे.
चित्त्यांसाठी कोट्यवधी खर्च होणार
या चित्त्यांवर होणार खर्चही तेवढा मोठा आहे. पुढील पाच वर्षात या चित्त्यांवर 75 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून पन्नास कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय.