
टीम इंडियाने फायनलमध्ये मिळवलेल्या विजयानंतर भारताने दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं हे स्वप्न अधूर राहिलं होतं. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने दोन फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवाच लागणार होता.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये167-7 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करतान आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 160-8 धावा करता आल्या. टीम इंडियाने हा सामना सात धावांनी जिंकला.

फायनल सामन्यामध्ये 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज आफ्रिकेच्या संघाला होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला रोखलं आणि वर्ल्ड कपवर नाव कोरलं. आफ्रिकेचा पराभवावर ए. बी. डिव्हिलीयर्स पाहा काय म्हणाला.

साऊथ आफ्रिकेच्या टीमने आपली मान अभिमानाने वर ठेवावी, तुम्ही सगळेजण हिरो आहात. आफ्रिकेच्या आतापर्यंतच्या सर्व संघांच्या एक पाऊल तुम्ही पुढे गेले आहात. चांगली वेळ येणं अजून येणे बाकी असल्याचं ए बी डिव्हिलीयर्सने म्हटलं आहे. त्यायसोबतच ए बीने आपल्या पोस्टमध्ये टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता. शेवटपर्यंत अपराजित राहिलेल्या आफ्रिका संघाला टीम इंडियाने फायनलमध्ये पराभूत केलं.