भारतात पाकिस्तानी टीमची पोलखोल, World Cup आधी असे फसले

ICC World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ जवळपास सात वर्षानंतर भारतात खेळण्यासाठी आला आहे. दोन खेळाडू सोडले तर टीममधील कोणत्याच खेळाडूला भारतात खेळण्याचा अनुभव नाही. पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानी संघ बॅकफूटवर पाहायला मिळाला. त्यामुळे आगामी सामने त्यांच्यासाठी कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.

भारतात पाकिस्तानी टीमची पोलखोल, World Cup आधी असे फसले
| Updated on: Oct 03, 2023 | 8:08 PM

PAK VS AUS : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सराव सामना होत आहे. पाकिस्तानी टीम जवळपास 7 वर्षांनंतर भारतात खेळत आहे. ‘विश्वचषक’साठी निवड झालेल्या खेळाडूंपैकी केवळ दोनच खेळाडू असे आहेत जे याआधी भारतात खेळले आहेत. कर्णधार बाबर आझम, उपकर्णधार शादाब खान आणि फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीही पहिल्यांदाच भारतात खेळणार आहेत. हे सर्व खेळाडू काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील खेळपट्टीवर खेळत होते, तेव्हा ते आपल्या बॅटने खूप धावा करत होते. आयसीसी क्रमवारीतही बाबर आझम, फखर जमान आणि इमाम उल हक यांची ताकद दिसून येत होती, पण भारतात आल्यानंतर केवळ त्यांचे फलंदाजच नाहीत, तर गोलंदाजांचीही अवस्था बिकट झाली आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात आमने-सामने आहेत. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सात विकेट गमावत 351 धावा केल्या.  पाकिस्तानला पहिला धक्का बसला जेव्हा त्यांचा वेगवान गोलंदाज नसीम शाह वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. यानंतर आता शाहीन शाह आफ्रिदी प्रत्येकी एका विकेटसाठी आसुसलेला आहे. आज शाहीन शाह आफ्रिदीने 6 षटकात 25 धावा दिल्या, पण विकेटची संख्या शून्य राहिली. तर हसन अलीने सहा षटकात २३ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. हरिस रौफने 9 षटकात 97 धावा दिल्या आणि एक विकेट त्याच्या नावावर होती. तर फिरकीपटू आणि उपकर्णधार शादाब खानने दहा षटकांत ६९ धावा दिल्या. बाबर आझमच्या अनुपस्थितीत या सामन्यातही तो कर्णधार होता. उस्मान मीर हा एकमेव गोलंदाज होता ज्याने दोन बळी घेतले.

पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच फटका

पाकिस्तानी संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सरावाची संधी मिळाली, तेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या, त्यानंतर पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु न्यूझीलंडने 43.4 षटकात 5 विकेट गमावत 346 धावा करत सामना जिंकला. त्या सामन्यात हरिस रौफ, हसन अली यांच्यासह सर्वच गोलंदाजांनी चांगलीच बाजी मारली होती. म्हणजेच, पाकिस्तानी गोलंदाजांचा वेग आणि फिरकी भारताच्या बरोबरीने अजूनही नाही, अशा स्थितीत मुख्य सामने सुरू झाल्यावर संघ पराभवापासून कसा वाचणार हे पाहावं लागेल.