“बालासोर रेल्वे अपघाताचा मोदी सरकार इव्हेंट करतंय”, संजय राऊत यांचा घणाघात
ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटना देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता.अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे.
मुंबई: ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटना देशातील इतिहासातील सर्वात भयंकर अपघात होता.अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी गेले. तिथे मोदी मोदींच्या घोषणा झाल्या. हे सरकार अपघाताचंही इव्हेंट करत आहे. या देशात असं कधी झालं नाही. जिथे सीबीआय चौकशी करायची तिथं करत नाही. आम्ही भाजपला पुरावे दिले. पण चौकशी नाही. मुळात सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. पंतप्रधान राजीनामा देणार आहात? जबाबदारी कोण घेणार?अपघाताचं इव्हेंट करणारं हे सरकार आहे. स्मशानातही तुम्ही इव्हेंट करत आहात?, असा सवाल संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
