AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton: कापसाचे उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना सावरले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे स्थिती?

खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली असली तरी बाजारपेठेतील दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलेच सावरलेले आहे. उत्पादन घटूनही सुरवातीला सोयाबीन, कापसाचे दर हे कमीच होते. मात्र, यंदा शेतकऱ्यांनाच बाजारपेठेचे गणित कळाले होते. त्यामुळेच वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्रीच नाही असा निर्धार केला होता.

Cotton: कापसाचे उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना सावरले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे स्थिती?
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 14, 2022 | 9:34 AM
Share

नंदुरबार : खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पादनात घट झाली असली तरी बाजारपेठेतील दराने यंदा शेतकऱ्यांना चांगलेच सावरलेले आहे. उत्पादन घटूनही सुरवातीला सोयाबीन, कापसाचे दर (Cotton Rate) हे कमीच होते. मात्र, यंदा शेतकऱ्यांनाच (Market) बाजारपेठेचे गणित कळाले होते. त्यामुळेच वाढीव दर मिळाल्याशिवाय शेतीमालाची विक्रीच नाही असा निर्धार केला होता. शेतकऱ्यांचा तो निर्णय आता फायदेशीर ठरत असून हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Agricultural Produce Market Committee) नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 11 हजाराचा दर मिळाला आहे. गेल्या 10 वर्षातील हा विक्रमी दर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे उत्पन्नात मात्र, वाढ झाली आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना कापसासह सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे हंगामाचा शेवट हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने गोड होतानाचे चित्र आहे. नंदुरबार येथील स्वर्गीय राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज 1 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाला 9 ते 11 हजार 400 पर्यंत दर मिळत आहे.

50 हजार क्विंटल कापसाची खरेदी

शेतकऱ्यांनी तारेवरची कसरत करीत खरिपातील पिकांची जोपासणा केली होती. मात्र, सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झाली होती. असे असतानाही स्वर्गीय राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज 1हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. तर आजपर्यंत बाजार समितीतील परवानाधारक कापूस व्यापाऱ्यांनी 50 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. तर दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला विक्रमी दर मिळतील असे चित्र होते. अखेर बाजारपेठेतील वाढती मागणी आणि शेतकऱ्यांनी घेतलेले निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे.

असे वाढत गेले हंगामात कापसाचे दर

मुळात कापूस लागवडीच्या क्षेत्रातच घट झालेली आहे. असे असताना पुन्हा निसर्गाची अवकृपा यामुळे उत्पादन घटले होते. एवढे सर्व होऊनही हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नव्हती. शिवाय खरेदी केंद्रही उभारली गेली नव्हती. सुरवातीला कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. मात्र, उत्पादनात घट होऊनही ही अवस्था म्हणून शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे 8 हजारावरील कापूस आज 11 हजार रुपये क्विंटल या प्रमाणे विकला जात आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर ही वाढीव दरातून निघाली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात आवक घटली

गेल्या चार महिन्यापासून कापसाचा हंगाम सुरु आहे. दिवसेंदिवस कापसाच्या दरात सुधारणाच होत गेली. नागपूरमध्ये तर गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही तो यंदा शेतकऱ्यांच्या पदरी पडला होता. हीच अवस्था सर्वत्र आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवली त्यांची चांदी होत आहे. वाढीव दरामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेतले होते. पण गेल्या 8 दिवसांपासून कापसाचीही आवक कमी होताना पाहवयास मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Chilly Rate: लाल मिरचीचा ठसका 25 हजार रुपये क्विंटल पार, ‘तेजा’ चीही तेजी कायम..!

PM Kisan Yojna: शेतकऱ्यांनो 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर 11 व्या हप्त्याचीही वाट बिकट..! ही प्रक्रिया करावीच लागणार

कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद