“नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग…”, सुमित राघवन संतापला

अभिनेता सुमित राघवन समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे.

नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग..., सुमित राघवन संतापला
सुमित राघवन
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 12:11 PM

मुंबई : अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghawan) समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण (Encroachment) हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

सुमित राघवनचं ट्विट

सुमित राघवन याने एक ट्विव करत अतिक्रमणावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

व्हीडिओतून भाष्य

सुमितने आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून अतिक्रमणावर आपलं मत मांडलं आहे. “तीन दिवसापूर्वी ही दुकानं हटवण्यात आली होती. पुन्हा ही दुकानं त्याच ठिकाणी दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असं अतिक्रमण करत दुकानं थाटली जातात, त्याला परवानगी कशी मिळते?, हे मला जाणून घ्यायचं आहे. मी मुंबई महापालिकेला विनंती करतो की त्यांनी अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा प्रश्न सोडवावा”, असं म्हणत सुमित राघवनने संताप व्यक्त केला.

सुमित राघवनने नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडला आहे. यावर आता मुंबई महापालिका लक्ष देणार का आणि हा प्रश्न सुटणार का?, हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी

कोण आहे ‘ती’ खास व्यक्ती? नेहा पेंडसेच्या प्रश्नावर संस्कृतीचा इशारा