लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट, डॉ. आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti) साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट, डॉ. आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 12:30 PM

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti) साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. देशात सध्या कोरोना फोफावत चालला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. सर्वांनी हा लॉकडाऊन पाळण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे (Sharad pawar on Dr. Babasaheb Ambedkar jayanti).

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या बाहेरदेखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात आपण साजरी करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण जवळपास महिना ते दीड महिना साजरा करत असतो. मात्र, आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का? याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे. आपण अनेकदा आंबेडकर जयंतीसारखा सोहळा हा तीन ते चार आठवडे साजरा करत असतो. यावेळेला थोडंस या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का? याचा विचार निश्चितपणे करायची वेळ आली आहे.

आपण सामूहिकपणे एकत्र आलो तर त्यामुळे नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांचे योगदानाचे आठवण करुया.

दिल्लीचा मरकजचा सोहळा टाळायला हवा होता. पण तो टाळला गेला नाही. त्याचे परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांनी दिल्लीवरुन प्रवास केल्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील लोकांचे सणवार असतात. पण आजची स्थिती पाहूण पथ्य ही पाळलीच गेली पाहिजेत.

लॉकडाऊन सर्वांनी पाळायला हवा. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करु. एका चुकीची किंमत सर्वांना चुकवावी लागते. त्यामुळे पोलिसांना भूमिका घ्यावी लागते.

एकत्र राहू नका हेच माझं आग्रहाचं सांगणं आहे. ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचं पालन करा. पोलिसांवर हल्ले होत आहेत. हे योग्य नाही.

कोरोनाविरोधातील या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगलं लक्ष घालत आहेत. पोलीसही अतिशय चांगलं काम करत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, छोटे उद्योजक सगळे अडचणीत आहेत. मात्र, आणखी दोन आठवडे काळजी घेऊया. हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य बोलावणं हा अगदी शेवटचा पर्याय आहे.

सध्या सुट्टी आहे. या सुट्टीचा घरातल्या घरात चांगला आस्वाद घ्या. उत्तम आरोग्य कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा. मराठीत खूप उत्तम साहित्य आहे. ते तुम्ही वाचू शकता. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य वाचा.

जीवनाश्यक गोष्टींची लोकांना गरज आहे ही गोष्ट खरी आहे. पण या राज्यात भाजीपाला, किराणा याची कमतरता नाही. राज्य सरकारने किराणा दुकान सुरु ठेवायला संमती दिली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी अनेक सुचना दिल्या आहेत. राज्यातील 90 टक्के लोक सुचनांची अंमलबजावणी करत आहेत.  पण अजूनही 10 टक्के लोक रस्त्यावर दिसतात.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 341 वर, कुठे किती रुग्ण सापडले?

रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट, चालून थकल्यावर तिथेच मुक्काम, चूल मांडून स्वयंपाक, मुंबई ते कोकण चाकरमान्यांची पायपीट

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.