रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?

जर तुम्हीही रात्री पाय न धुता झोपायल गेलात तर अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे रात्री झोपण्याआधी पाय धुणे फारच महत्त्वाचं असतं. अनेकांना यामागील कारणे माहित नसतील. चला जाणून घेऊयात.

रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?
wash your feet every night before going to bed
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 23, 2025 | 5:58 PM

दिवसभर जवळपास सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण हा सर्व ताण जाणवतो तो रात्री. हा ताण, थकवा दूर करण्यासाठी अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तर काहीजण झोपण्यापूर्वी त्यांचे चेहरा, हात आणि पाय धुतात. यामुळे त्यांना खूप आराम मिळतो. काही वेळेला खूप थकल्याने बऱ्याचदा आपण काम आवरून झाल्यानंतर लगेच झोपायला जातो. पण तज्ज्ञांच्या मते काहीही झाले तरी रात्री झोपण्यापूर्वी पाय मात्र आवर्जून पाय धुवूनच झोपावं. काय आहेत त्यामागील कारणे जाणून घेऊयात.

काहीजणांना नक्कीच हे दिवसाच्या शेवटी, पाय जड झाल्यासारखे वाटतात

खरंतर, पाय शरीराचा संपूर्ण भार उचलतात. काहीजणांना नक्कीच हे दिवसाच्या शेवटी, पाय जड झाल्यासारखे वाटतात. हे केवळ घट्ट बूट घालण्यामुळे किंवा दिवसभर उभे राहिल्यामुळेच नाही तर काळजीच्या अभावामुळे देखील होते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे, पायांनाही काळजीची आवश्यकता असते. काही लोक आळसामुळे पाय धुत नाहीत, जे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

पाय म्हणजे…. 

बाहेरून घरी आल्यानंतर लोक अनेकदा चेहरा आणि हात धुवायला जातात. पण जेव्हा पायांचा प्रश्न येतो तेव्हा ते ते विसरून जातात. पाय न धुण्याची सवय तुम्हाला आजारी बनवू शकते. कारण पाय म्हणजे बॅक्टेरियांचं घर असतं. त्यांना धुण्यात दुर्लक्ष केल्याने तुमच्या पलंगावर जंतू पसरू शकतात. त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. त्याचे अनेक फायदे आहेत.

पाय धुणे का आवश्यक आहे?

रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहे. दिवसभर पाय मोजे आणि शूजमध्येच राहतात. यामुळे खूप घाम येतो आणि जंतू वाढू लागतात. विशेषतः जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. जर पाय योग्य वेळी धुतले नाहीत तर बॅक्टेरिया वाढतात आणि पायाच्या बोटाभोवती खाज आणि ओलावा निर्माण होऊ लागतो. यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात आणि कधीकधी त्वचा सोलायला लागते. ज्याला अ‍ॅथलीट फूट असेही म्हणतात. अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून संसर्ग पसरणार नाही.

अशा परिस्थितीत पाय धुणे खूप महत्वाचे

स्वच्छता राखण्यासाठी पाय धुणे महत्वाचे आहे. हे केवळ बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासाठीच नाही तर इतर प्रकारच्या संसर्गांसाठी देखील आवश्यक आहे. जर पायांवर चिरे असती किंवा मुरुम असेल तर शरीरात बॅक्टेरिया जाण्याची भीती असते. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात. अशा परिस्थितीत पाय धुणे खूप महत्वाचे आहे.याशिवाय, रात्री पाय धुण्याने पायांची दुर्गंधी दूर होतेच, शिवाय चांगली झोपही येते. कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून पाय बुडवून धुण्याने स्नायूंना आराम मिळतो आणि सांध्यांना आराम मिळतो.

मधुमेही रुग्णांनी रात्री पाय धुणे खूप महत्वाचे आहे

मधुमेही रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायांमधून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. पायांवरील जखमांची स्वच्छता करणे महत्वाचे आहे. जेणेकरून गँगरीन, पू जमा होण्याची शक्यता राहणार नाही. म्हणून त्यांनी विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. आणि ते स्वच्छपणे कोरडेही करावे.