पाकिस्तानचे 3 तुकडे होणार, पाकिस्तानच्या नेत्याने संसदेत सांगितले पासपोर्ट लागणार..

पाकिस्तान पूर्णपणे अस्थिर झाला. पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात. परिस्थितीत दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहेत. लोकांमधील रोष प्रचंड वाढलाय. लोक रस्त्यावर येऊन मोठी मागणी करत आहेत. यादरम्यानच पाकिस्तानी संसदेतील धक्कादायक व्हिडीओ पुढे आला.

पाकिस्तानचे 3 तुकडे होणार, पाकिस्तानच्या नेत्याने संसदेत सांगितले पासपोर्ट लागणार..
Pakistan
| Updated on: Jul 31, 2026 | 8:54 AM

पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. वाढती महागाई आणि वीजेच्या वाढलेल्या दराच्या मुद्द्यात लोकांमधील रोष वाढला. यासोबतच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागलीये. गेल्या काही दिवसांपासून लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला. ज्यात 40 आंदोलक ठार झाले तर हजारो गंभीर जखमी झाले. पाकिस्तानच्या अनेक भागात अशांतता पसरली आहे. लोकांचा रोष वाढत आहे. पाकिस्तान भीकेला लागला. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाचा मोठा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्यामध्येच आता पाकिस्तानचे तुकडे पडण्याची स्थिती निर्माण झाली. याबाबत गंभीर चिंता थेट पाकिस्तानी संसदेत खासदाराकडून व्यक्त करण्यात आली.

यादरम्यानचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. पाकिस्तान विभागला जाणार असल्याची चिंता आता संसदेतही व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या संसदेत खासदार मौलाना अता-उर-रहमान यांनी म्हटले की, पाकिस्तान आता विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तळमळ स्पष्ट दिसत आहे.

संसदेत भाषणादरम्यान त्यांनी म्हटले की, तो दिवस दूर नाही जेव्हा बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये जाण्यासाठी आपल्याला पासपोर्टची गरज भासू शकते. त्याचे हे विधान सध्याच्या परिस्थितीवर अत्यंत सूचक विधान आहे. म्हणजेच पाकिस्तानचे तुकडे पडू शकतात, असे त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत म्हटले. पाकिस्तानमध्ये विभाजन होईल, अशीच परिस्थिती आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. लोक रस्त्यावर येऊन विभाजणाची भाषा करताना दिसत आहेत.

पाकिस्तानमधील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी एक धक्कादायक विधान देखील केले. जाहीरपणे कबूल केले आहे की,पाकिस्तानची सध्याची शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशाची 70 वर्षे जुनी व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले. आता पाकिस्तानचे काही तुकडे पडू शकतात, अशी परिस्थिती आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us