Pakistani woman : पाकिस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतात, वाचा भारतात आल्यानंतर काय म्हणाली

| Updated on: Aug 23, 2022 | 9:04 AM

मी भारतात आल्यापासून मला खूप छान वाटतं आहे. मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय. तसेच मी अनोळखी लोकांसोबत आहे असं मला वाटतं नाही. विशेष म्हणजे माझ्यासाठी इथे कोणी नवीन नाही, सगळेचं जुने आहेत. असं पाकिस्तानातून आलेली तरूणी शुमाइला हीने सांगितले.

Pakistani woman : पाकिस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतात, वाचा भारतात आल्यानंतर काय म्हणाली
किस्तानातील तरुणी नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी भारतात
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली – लग्नाच्या कथा आत्तापर्यंत आपण अनेक ऐकल्या आहेत. तसेच परदेशातील व्यक्तीशी लग्न अशा पद्धतीच्या देखील तुम्ही कथा तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. आज सुध्दा एक अशीचं घटना तुम्हाला इथं वाचायला मिळणार आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) एक तरुणी लग्न करण्यासाठी भारतात (India) परतली आहे. तिने लाहोर येथील चेक पोस्ट प्रवेश द्वारातून भारतात प्रवेश मिळविला आहे. त्यावेळी तिथं तरूणाची घरातील सगळे कुटुंबिय उपस्थित होते. त्यांनी तरुणीचं स्वागत देखील केलं आहे. कमल कल्याण (Kamal Kalyan) असं तरूणाचं नाव आहे, तर शुमाइला (Shumaila) असं तरुणीचं नावं आहे. दोघांनी कोरोनाच्या आगोदर ऑनलाईन पद्धतीने लग्न केलं असल्याची माहिती टाईम्सने दिली आहे. 2020 लग्न करणार होते. परंतु कोरोनाचा संसर्ग देशात अधिक असल्याने त्यांचं लग्न झालं नाही.

मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय

मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय

मी भारतात आल्यापासून मला खूप छान वाटतं आहे. मी माझ्याचं लोकांसोबत आहे असं मला वाटतंय. तसेच मी अनोळखी लोकांसोबत आहे असं मला वाटतं नाही. विशेष म्हणजे माझ्यासाठी इथे कोणी नवीन नाही, सगळेचं जुने आहेत. असं पाकिस्तानातून आलेली तरूणी शुमाइला हीने सांगितले. ती आमची सून नव्हे मुलगी आहे असं तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.

मी भारतात आल्याने घरचे खूष आहेत

तरुणीचे लग्न हे तिच्या कुटुंबियांनी ठरविले आहे. त्याचबरोबर माझ्या घरच्यांनी जे मला सांगितले तसे मी केले आहे. पाकिस्तानात असताना अनेकदा माझ कल्याण कमल यांच्याशी बोलणं होतं होतं. तसेच काहीवेळेला आम्ही दोघांनी व्हिडीओच्या माध्यमातून देखील बोलणं केलं आहे. ज्यावेळी तरुणी भारतात येणार होती. त्यावेळी तिचे सगळे मित्र मैत्रीणी आणि कुटुंबिय लाहोरच्या गेटपर्यंत सोडायला आले होते. मी माझ्या घरच्यांना कायम संपर्कात आहेत. तसेच मी जो काही निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या घरातील सदस्य अत्यंत खूष आहेत. शुमाईला भारतात येण्यासाठी दोनदा व्हिसासाठी अर्ज करावा लागला. कारण सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर मला भारतात येण्याची परवानगी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही देशातील सरकारने ही पद्धत थोडीसी सोपी करावी अशी विनंती सुध्दा शुमाईला या तरुणीने केली.